-- सुशांत सावंत
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘ मन की बात ‘ महाराष्ट्रातल्या घरा घरात पोचवणार असल्याची माहिती भाजप नेते प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिली. लाड यांच्यावर प्रदेश भाजपनं पंतप्रधान मोदी यांच्या 'मन कि बात' ह्या कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसाराची जबाबदारी प्रसाद लाड यांच्यावर प्रदेश भाजपने दिली आहे.
हे देखील पहा :
याबद्दल बोलताना लाड म्हणाले, ३० जानेवारी २०२२ पर्यंत ७५ हजार बुथपर्यंत 'मन कि बात' हा कार्यक्रम पोचवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनतेबद्दलच्या भावना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं प्रयत्न यानिमित्ताने करणार आहे. या कामाचा शुभारंभ उद्याच करणार असून प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात देखील उद्यापासून होणार आहे.
या कार्मक्रमासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि संघटनमंत्री श्रीकांत भारतीय यांच्याबरोबर उद्या एक VC बैठकही पार पडणार असून यामध्ये सविस्तर चर्चा होईल. मुंबई महानगर पालिका आणि राज्यातील निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर महापालिकेतही ‘ मोदी ब्रॅंन्ड ‘ साठी भाजपची जोरदार तयारी सुरु आहे. राज्यातील प्रत्येक छोट्या छोट्या ठिकाणांपासून भाजपची संघटनात्मक बांधणीवर भर असणार आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.