
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेने शहरातील हिरा घाट येथे बनवलेल्या विसर्जन (ganesh visarjan) घाटात शनिवारी एका सहा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राजवीर नितीन बेलेकर (वय सहा) असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. (Ulhasnagar Latest Marathi News)
बेलकर कुटुंबीय हे हिराघाट भैयासाहेब आंबेडकर सोसायटी येथे वास्तव्यास आहे. दुपारी चार वाजता राजवीर बेपत्ता झाला. त्यास सर्वत्र शोधत असताना शनिवारी रात्री दहा वाजता त्याचा विसर्जन घाटातील पाण्यामध्ये मृत्यूदेह सापडला. महानगरपालिकेने बांधलेल्या या विसर्जत घाटामध्ये सहा वर्ष मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
पालिकेच्या अनास्थेमुळे ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. जोपर्यंत या घटनेप्रकरणी दोषीवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.