मुंबई - राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आता आणखी चिघळले आहे. ३०च्या वर एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालय जो आदेश देईल त्याचे पालन करू, न्यायालयाच्या आदेशानुसार जीआर काढून समिती गठीत केली जाईलअसे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले आहेत.
हे देखील पहा -
पुढे अनिल परब म्हणाले की, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे न्यायालयाला सांगण्यात येईल आणि त्यानंतर न्यायालय आपला निर्णय देईल. महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन केल्याशिवाय आम्ही कामावर हजर राहणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी घेतली आहे. याच विलीनीकरण बाबत सरकार कायदेशीर प्रक्रिया आज पूर्ण करेल. विलीनीकरण केल्यास सरकारच्या तिजोरीवर किती ताण पडेल याचा अभ्यास ही कमिटी करणार आहे. मुख्यसचिव, परिवहन सचिव, फायनान्स सेक्रेटरी यांच्या अधिपत्याखाली त्रिसदस्यीय समिती असेल आणि त्याचा जीआर काढला जाईल. विलीनीकरणाच्या एकूणच मागणिबाबत अभ्यास करून या समितीने आपला निर्णय सरकारला द्यायचा आहे. तसेच संप चिघळण्यापेक्षा त्यावर तोडगा काढायचा काम सरकार करत आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
ऐन दिवाळीत हा संप पुकारल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत कारण आज एसटी संपाचा आजचा चौदावा दिवस आहे. राज्यातील अनेक बस डेपो बंद आहेत. वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहे. आता न्यायालय यावर काय आदेश देणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.