कैलास चौधरी
उस्मानाबाद - केतकी चितळेचा मला अभिमान असल्याचे सांगत सदाभाऊ खोत यांनी केतकीचे केले समर्थन आहे. सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे आज उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे आले होते. दरम्यान त्यांनी केतकीच्या समर्थन केले आहे. केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्या वर वादग्रस्त पोस्ट केली होती. तिचे समर्थन करत केतकी कणखर आहे तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही,तिला मानावे लागेल, न्यायालयात तीने स्वतःची बाजू स्वतः मांडली असे म्हणत देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. सदाभाऊ खोत यांच्या या भूमिकेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
हे देखील पाहा -
तुमची नैतिकता कुठे गेली होती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर वेगळा शब्द वापरत टीका केली त्यावेळी नैतिकता कुठे होती असा प्रश्न उपस्थित केला. या सोबतच अमोल मिटकरीने देखील ब्राम्हण समाजाला टार्गेट केले त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हते का..? असे म्हणत सरकारवर टीका केली.
स्वतःवर टीका केली की सगळे आठवते, राज्यात सरकार पुरस्कृत आतंकवाद राज्यात वाढवला असून प्रस्थापितांनी नेहमी विस्थापितांच्यावर अन्याय केला आहे आम्हाला हा प्रस्थापितांच्या वाडा पाडायचा असल्याचे खोत म्हणाले. समोरून दगड येत असेल आणि ज्याच्या अंगावर दगड पडला तर त्याने काय गुहेत लपायचं का?, असा सवालही त्यांनी केला.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.