
New Delhi :
इंडिया आघाडीची समन्वय समितीची महत्त्वाची बैठक काल पार पडली. या बैठकीत जागावाटपाबाबत काय चर्चा झाली याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
जागावाटप महत्त्वाचा मुद्दा आहे. जागावाटप हे त्या त्या राज्यस्तरावर व्हावं, असं कालच्या बैठकीत ठरलं आहे. महाराष्ट्रात तशी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात जागावाटपाचा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही. जो जिंकेल त्याला ती जागा सोडू असं आमचं ठरलं आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. (Latest Marathi News)
आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर विधीमंडळात आज सुनावणी सुरु होत आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्देश देऊनही आमदार अपत्रतेचा निर्णय घ्यायला अध्यक्षांनी टाळाटाळ केली. राज्यात बेकायदेशीर सरकार काम करत आहे, त्याला कुठलाही आधार नाही.
शिवसेनेत फूट पाडून सरकार पाडलं. अजित पवार आणि आमदार राष्ट्रवादीतून फोडले आणि सरकारमध्ये घेतले. घटनेचं पालन करण्यासाठी त्यांना सद्बुद्धी मिळो, असं संजय राऊत यांनी म्हटलं. (Political News)
सरकारच्या चेहऱ्यावर भीती दिसत आहे. अजित पवार जरी अनुभवी असले तरी त्यांची सरकार चालवताना दमछाक होत आहे. सरकारच्या दृष्टीने मराठा आंदोलनाचा मुद्दा किती गंभीर आहे हे आपल्याला क्लिपमधून दिसून आलं, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.