Mumbai: केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंधेला पद्य पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये समाजवादी पक्षाचे दिवंगत संस्थापक मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकारच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुलायमसिंह यादव यांच्या पुरस्कारावर आक्षेप घेत केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. (Sanjay Raut)
काय म्हणाले राऊत...
मुलायमसिंह यादव यांना दिलेल्या पुरस्कारावर आक्षेप घेताना संजय राऊतांनी सरकारला बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर पडला आहे अशी जोरदार टीका केली. त्याचबरोबर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार कधी देणार असा सवालही त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.
सामनामधूनही टीका...
ज्या मुलायमसिंह यादव यांनी कारसेवकांना गोळया घालून ठार केलं, ज्या मुलायमसिंह यांना भाजपने ‘मौलाना मुलायम’ म्हणून हिणवलं त्याच मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुहृदय सम्राटांना पुरस्कार देण्यात आला नाही. त्यांना मोदी सरकार विसरले. सावरकरांना पुरस्कार देण्यापासून मोदी सरकारला कोणी रोखले होते? असा संतप्त सवाल दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
त्याचबरोबर बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालविणारे सरकार राज्यात आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्याचा मोठा गाजावाजा केला. पण याच सरकारने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांच्या नावाची भारतरत्नासाठी शिफारस केली असती तर त्यांचे हे ढोंग लपले गेले असते, असा टोलाही सामनामधून लगावण्यात आला आहे. (Shivsena)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.