पुणे : बाळासाहेब ठाकरेंबरोबर ३० वर्ष काम केलं. ते असताना सुद्धा विरोधकांना सामनातून मीच उत्तर द्यायचो. अजूनही आमच्या पक्षात अनेक लढवय्ये आहेत. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांची हिम्मत झाली नसती. मी त्यांना चळाचळा कापताना बघितलं आहे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. ( Maharashtra Politics Latest News In Marathi )
हे देखील पाहा -
पुण्यात आज आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते रोहीत पवार यांच्या पुढाकाराने कनेक्ट महाराष्ट्र कॅानक्लेव्हचं आयोजन करण्यात आलं.या कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) आणि संजय राऊत यांची मुलाखत संपन्न झाली. या मुलाखतीत संजय राऊत यांनी अनेक प्रश्नावर बेधडक उत्तरे दिली. संजय राऊत पुढे म्हणाले, 'आत्ता जे सरकार बनले ते बाळासाहेबांचंही स्वप्न होतं. ते म्हणायचे ही ताकद एकत्र आली तर एकत्र आली तर दिल्लीला झुकवलं असतं'. 'महाराष्ट्रात शिवसेनेच्या माध्यमातून भाजप पक्ष वाढला. आज भाजपमधील ७५ टक्के लोक हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षातून गेले आहेत. २०२४ च्या आधी यांचे अर्धे दुकान खाली होणार आहे',अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर टीका केली.
संजय राऊत पुढे म्हणाले, 'आमच्या पेक्षा ही पिढी समाजाशी अधिक जोडली गेलेली आहे. सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर आजची पिढी करते. माझी मुलगी मोबाईवर पेपर वाचते. लोकांच्या मनात जे विष पेरलं जातं, त्याचा प्रतिवाद करताना नवी पिढी दिसते. 'महाविकास आघाडी सरकार हे प्रबोधनकार ठाकरेंच्या विचाराने चाललेलं सरकार आहे. प्रबोधनकार समजून घ्यायचे असतील तर एकदा शरद पवार साहेबांचं व्याख्यान ठेवा, असंही संजय राऊत म्हणाले.
Edited By - Vishal Gangurde
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.