ठाकरे घराण्याचा 'राजकीय अस्त'? नेमकी काय आहेत कारणे? जाणून घ्या!

नाट्यमय घडामोडींनंतर आता शिंदे यांनी ट्विट करून शिवसेनेचे बंडखोर आमदार भरत गोगावले यांची पक्ष प्रतोदपदी निवड केल्याची माहिती दिली.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Tv

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. याची सर्वाधिक झळ शिवसेनेला बसल्याचे सध्या तरी चित्र दिसत असल्याचे बोलले जाते. या नाट्यमय घडामोडींनंतर आता शिंदे यांनी ट्विट करून शिवसेनेचे बंडखोर आमदार भरत गोगावले यांची पक्ष प्रतोदपदी निवड केल्याची माहिती दिली. शिंदे यांच्या या कृतीने थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिल्याचं मानलं जात आहे. अशात आता ठाकरे घराण्याचा राजकीय अस्त झाला का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

शिवसेना (ShivSena) नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावून समर्थक आमदारांसह थेट गुजरातमधील सूरत गाठले. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार परत येतील यासाठी प्रयत्न केले. त्यांच्याशी चर्चेचा प्रयत्नही झाला. पण हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे आतापर्यंतच्या घडामोडींवरून तरी लक्षात येत आहे.

शिंदे यांना पक्षाने गटनेतेपदावरून हटवल्यानंतर परतीचे दार जवळजवळ निश्चित झाल्याचे बोलले जात होते. त्यात आता पक्ष प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड केल्याचे शिंदे यांनी ट्विटरवरून जाहीर केले. एकप्रकारे शिवसेनेवर शिंदे यांनी दावा करून उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ठाकरे घराण्याचा राजकीय अस्त आहे का? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत राजकीय विश्लेषक, पत्रकार यांनी विविध मते व्यक्त केली आहेत.

Uddhav Thackeray
नवी मुंबईत बदलाचे वारे ? शिवसैनिकांचे एकनाथ शिंदेंविरोधातील मूक आंदोलन अचानक स्थगित

शिवसेनेवर ही वेळ का आली?

राज्यसभा निवडणुकीपासूनच या शक्यतेची कुणकुण लागली होती. राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना जास्त कोटा द्यायचा, शरद पवार यांनी रणनीती ठरवली होती. पण या रणनीतीला सेनेतील नेत्यांनी विरोध केला. परिणामी संजय पवार यांचा निवडणुकीत पराभव झाला. उद्धव ठाकरे साधे नेते आहेत, त्यांना विधिमंडळाच्या कामकाजाचा फार अनुभव नाही. शरद पवार यांनी जर बंडखोरीचा निरोप पाठवला होता, तर ठाकरेंनी सावध राहायला हवे होते, पण तसे झाले नाही, हे गंभीर आहे. या संदर्भात आता खरे सत्य बाहेर येत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या हातून ही चूक कधीच झाली नसती, असं मत ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी व्यक्त केले.

शिवसैनिकांची खदखद समजली नाही?

एकनाथ शिंदेंनी घेतलेली भूमिका महत्वाची आहे. मी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देत आहे, हा त्यांचा दावा महत्वाचा आहे. महाविकास आघाडीच्या तडजोडीत हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला केला गेला. आता मुंबई महापालिका निवडणुकीत मत मागायला जात असताना, त्यांना तोंड द्यावे लागणार आहे. शिवसैनिकांची अनेकदा कामे केली नाहीत, म्हणून शिवसेना नेत्यांनी तक्रार केली होती. खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिला होता. एकनाथ शिंदेचा हा मुद्दाही महत्वाचा आहे, असे मत श्रीकांत उमरीकर यांनी व्यक्त केले.

Uddhav Thackeray
एकनाथ शिंदे यांचे बंडखोरीनंतर दुसरे ट्विट; उद्धव ठाकरेंना दिले आव्हान

राजकीय घसरण किंवा सामर्थ्याला प्रश्नचिन्ह

नारायण राणे, राज ठाकरे यांच्यापासून खदखदीला सुरूवात झाली होती. उद्धव ठाकरेंनंतर कोण? जर आदित्य ठाकरे यांचे नाव येत असेल तर काम केलेल्या शिवसैनिकांची फरफट होत आहे, अस चित्रं समोर आले आहे. यामुळे शिवसेना संपेल, असं काही होणार नाही. ठराविक सल्लागारांमुळे लोकांना टाळले जाते, तेव्हा ही परिस्थिती निर्माण होते. या बंडामुळे राजकीय घसरण किंवा सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहणार आहे, असे मत राजकीय विश्लेषक मकरंद मुळ्ये यांनी व्यक्त केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com