मुंबई : निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक नेहमीच समुद्र किनाऱ्यावर विसावा घेण्यासाठी जातात. पण समुद्रातील खवळणाऱ्या लाटांमध्ये पोहण्याचा मोह काही तरुणांना आवरत नाही आणि दुर्देवाने (water drowning) पाण्यात बुडाल्याच्या घटना घडतात. अशीच एक धक्कादायक घटना नालासोपारा कळंबच्या समुद्र किनाऱ्यावर (Nalasopara Beach) घडल्याचं समोर आलं आहे. समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेले तीन तरुण समुद्राच्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली.
या घटनेची माहिती मिळताच कळंब येथील अनिकेत नाईक आणि निखित निजाई यांनी जीवाची पर्वा न करता समुद्राच्या पाण्यात जाऊन दोन तरुणांना वाचवलं. परंतु, एकाचा दुर्देवाने मृत्यू झाला. सईच्या गावराई पाडा येथील रोहित यादव (२०)आणि राममंदिर येथील आझाद चाळीत राहणारा राहुल राजभर (२०) यांना जीव वाचला. तर जोगेश्वरी येथे राहणाऱ्या राजन मौर्या याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित, राहुल आणि राजन हे तिघेही समुद्रात आंघोळ करण्यासाठी गेले होते. पण त्यावेळी समुद्राल आलेल्या भरतीचा अंदाज न आल्याने हे तिघेही पाण्यात बुडाले. तरुण पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच कळंब येथील अनिकेत नाईक व निखिल निजाई यांनी खोल समुद्रात जाऊन जीवाची पर्वा न करता दोघांना रोहित आणि राहुलला वाचवले. पण दुर्देवाने त्यावेळी राजन पाण्यात सापडला नाही. आज दुपारी एकच्या सुमारास राजनचा मृतदेह समुद्र किनाऱ्यावर आढळला. या घटनेचा पुढील तपास अर्नाळा पोलीस करत आहेत.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.