वसई-विरार: वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर वाहून आलेला एका तरुणाचा मृतदेह पोलिसांनी बेवारस म्हणून किनाऱ्यावर पुरला होता. मात्र १५ दिवसांनी या मृतदेहाची (Dead Body) ओळख पटली असून त्याची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा पुरलेला मृतदेह पोलिसांनी पुन्हा जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढून कुटुंबियांच्या स्वाधीन केला आहे. (Time to exhume a corpse buried in the ground; The murder was due to a love affair In Vaisai-Virar)
हे देखील पाहा -
कांदिवली (Kandivali) येथे राहत असलेल्या दीपक कटकुर या २१ वर्षीय तरुणाचा हा मृतदेह असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या तरुणाचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या वादातून त्याचाच मित्र सूरज विश्वकर्मा याने १२ मे ला त्याची हत्या (Murder) करून त्याचा मृतदेह भाईंदर खाडीत फेकून दिला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह २ दिवसांनी म्हणजे १४ मे ला भुईगाव समुद्र किनाऱ्यावर वाहत आला.
कांदिवली पोलीस ठाण्यात दीपक हरवला असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी दाखल केली होती. पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करीत असताना प्रेमसंबंधातून दीपकची हत्या केल्याची कबुली आरोपी सुरज विश्वकर्मा याने पोलिसांना दिली आणि या प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी पुरलेला मृतदेह पुन्हा जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढून त्याच्या कुटूंबियांच्या स्वाधीन केला आहे.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.