नवी मुंबईतील वाहनांना वाशी, ऐरोली टोल माफी द्या; मंदा म्हात्रे यांची मागणी

लॉकडाउन काळात अनेकांच्या नोकऱ्या व्यवसायांवर गदा आल्याने किमान नवी मुंबईतील वाहनांना टोल माफ करण्यात यावा, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.
Manda Mhatre
Manda Mhatreविकास मिरगणे

नवी मुंबईतील (एमएच-४३ क्रमांकधारक) वाहनांना वाशी व ऐरोली येथील टोल माफ करण्यात यावे, अशी मागणी बेलापूरच्या (Belapur) आमदार मंदा म्हात्रे (Manda Matre) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. (Navi Mumbai Latest News)

हे देखील पहा -

नवी मुंबई शहर हे मुंबईला (Mumbai) लागूनच असल्याने येथील बहुतांश वाहने दररोजच मुंबईला ये-जा करतात, त्यामुळे नवी मुंबई पासिंग असलेल्या एमएच-४३ वाहनांना वाशी व ऐरोली येथील टोल माफ कसवा, याकरिता सहा वर्षे मागणी करीत आहे. २०१८च्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावर सभागृहात हा विषय मांडला होता.

Manda Mhatre
Corona : अकोल्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यु; रुग्णसंख्याही वाढतेय!

हा टोल नाका तयार झाल्यापासून नवी मुंबईतील नागरिक टोल भरणा करीत आहेत. या टोल वसुलीचा कार्यकाळ कधीच संपुष्टात आला असून रस्त्याची उभारणी आणि देखभालीचा खर्च वसूल झाला असतानाही टोल वसुली सुरूच आहे. लॉकडाउन काळात अनेकांच्या नोकऱ्या व्यवसायांवर गदा आल्याने किमान नवी मुंबईतील वाहनांना टोल माफ करण्यात यावा, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com