
देहूनगरी : तब्बल दोन वर्षानंतर देहूनगरीत वारकऱ्यांची मांदियाळी आहे. आळंदी मधील माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी राज्यातून अनेक वारकरी देहूनगरीत दाखल हाेऊ लागले आहेत .आळंदीत उद्या (मंगळवार, ता. ३०) ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी येत असतात. मात्र आळंदी येथे जाण्यापूर्वी सर्व वारकरी हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहूनगरीत येऊन तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन पुढे आळंदीत जात असतात. त्यामुळे आता देहूनगरीत वारकऱ्यांची मांदियाळी बघायला मिळत आहे.
देहूनगरीत सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दिसून येत आहे. इंद्रायणी नदी असताना देखील पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने वारकऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहूत आले आहेत. मात्र पिण्याचे पाणी नसल्याने water scarcity in dehu वारकऱ्यांच्या घशाला कोरड पडल्याचे चित्र सध्या देहूत पहायला मिळत आहे.
देहूमधील सुहास गोलांडे या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि काही स्थानिक नागरिकांनी एकवटून आता फिल्टर पाण्याचे बूथ लावून पिण्याच्या पाण्याची सोय वारकऱ्यांसाठी केली आहे. त्यामुळे तहानलेल्या वारकऱ्यांची तहान यामुळे भागली जात आहे. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने वारकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे.
edited by : siddharth latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.