मुंबई : लाखीमपूर खिरी या ठिकाणी शेतकऱ्यांना चिरडल्या प्रकरणी आज सर्वोच्य न्यायालयात सुनावणी होत आहे. जे यात मृत झाले त्यांना न्याय मिळेल. केंद्र सरकार कोणती माहिती लपवत आहे. आरोपींची नाव, ओळख निष्पन्न झाली आहे. तरी त्यांना का अटक केली जात नाही असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. why-suspected-culprits-are-not-yet-arrested-questions-mp-sanjay-raut-lakhimpur-latest-news-sml80
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना लाखीमपूर खिरी घटनेतील आराेपींना काेण वाचवत आहे असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले शेतकरी कुटुंबास न्याय मिळायला हवा. या घटनेत शेतकरी हा देशात म्हत्वाचा घटक मारला गेला आहे. तरीही सरकार काेणतीच कारवाई करत नाही. तुम्ही कुणाला वाचवत आहात? कुणासाठी वाचवत आहात? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.
येत्या साेमवारी (ता.११) महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. त्यावर हा राजकीय बंद नूसन या घटनेत मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांप्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी बंद असल्याचे राऊत यांनी नमूद केले. ते म्हणाले आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत हे संपुर्ण देशाला दाखवून देऊ.
राज्यातील काही जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीच्या निकालाबाबत राऊत sanjay raut यांनी हे महाविकास आघाडीचे यश असल्याचे नमूद केले. ते म्हणाले कोणाला किती जागा मिळाल्या हे ज्याने त्याने त्यांचे गणित मांडण्याचा प्रश्न आहे.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.