कोळसा तुटवड्याला मोदी सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार- नवाब मलिक

कोळशाच्या खाणी वितरीत करण्यात आल्या त्यावेळी भाजपने कोळसा घोटाळा झाला म्हणून रान उठवले होते.
कोळसा तुटवड्याला मोदी सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार- नवाब मलिक
कोळसा तुटवड्याला मोदी सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार- नवाब मलिकरश्मी पुराणिक

रश्मी पुराणिक

मुंबई: - देशात कोळसा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याला मोदी सरकारचे Modi Government चुकीचे धोरण असल्याचा थेट हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक Navab Malik यांनी केला आहे.

हे देखील पहा-

देशात कोळसा मिळत नाही त्यामुळे देशातील व राज्यातील बरेच वीजनिर्मितीचे संच Set of power generation बंद पडले आहेत. कोळसा आयात Coal Import करुनही तो उपलब्ध होत नाही. आयातीमुळे या देशातील जे परकीय चलन Foreign Currency आहे ते जास्त खर्च होतेय असेही नवाब मलिक म्हणाले.

युपीए सरकार UPA Government असताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग Manmohan Singh यांनी भविष्यात आपल्याला जास्त वीज लागणार आहे. याची निर्मिती झाली पाहिजे त्याची पॉलिसी Policy निर्माण केली. कोळशाच्या खाणी वितरीत करण्यात आल्या त्यावेळी भाजपने BJP Government कोळसा घोटाळा झाला म्हणून रान उठवले होते. त्यामुळे ते रद्द करण्यात आले होते आणि कालांतराने त्या खाणी काही लोकांना देण्यात आल्या. त्या आजपर्यंत त्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

कोळसा तुटवड्याला मोदी सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार- नवाब मलिक
VIP कल्चर नाकारणाऱ्या नितीन गडकरींचा साधेपणा; पहा Video

कोळशाच्या तुटवडा; खाणीत कोळसा असताना खणीकरण Mining होत नाही. कोळसा परदेशातून आयात होतो. या सर्व परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com