काबूल विमानतळावरून 150 भारतीयांचे अपहरण ?

अफगाणिस्तानकडून भारतासाठी खूप वाईट बातमी आहे. अल-इत्तेहा रुझच्या अहवालानुसार सुमारे 150 लोकांचे अपहरण करण्यात आले आहे. परंतु तालिबान कडून वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे.
काबूल विमानतळावरून 150 भारतीयांचे अपहरण ?
काबूल विमानतळावरून 150 भारतीयांचे अपहरण ?Saam tv

भारतासाठी अफगाणिस्तानकडून एक वाईट बातमी आहे. अल-इत्तेहा रुझच्या अहवालानुसार सुमारे 150 लोकांचे अपहरण काबुल विमानतळावरून करण्यात आले आहे. यातील बहुतेक लोक भारतीय असल्याचे सांगितले जात आहे. काबूल विमानतळाजवळ या लोकांचे अपहरण करण्यात आले आहे. अल-इत्तेहा यांनी सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, अपहरणकर्ते तालिबानशी जोडलेले आहेत आणि त्यांनी भारतीय लोकांना तारखीलकडे नेले आहे.

दरम्यान, आता यावर आता तालिबान कडून स्पष्टीकरण देण्यात आलय कि, आम्ही 150 भारतीयांचं अपहरण केलं नाही तर विमानतळाच्या आत सुरक्षितरित्या त्यांना नेण्यात आलय. तालिबानचे प्रवक्ते अहमदुल्लाह वसेक यांनी या वृत्ताच खंडन केलय.

काबूल विमानतळाबाहेर 220 भारतीय अडकले;

माहिती आहे की, अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील विमानतळाबाहेर सुमारे 220 भारतीय उपस्थित आहेत, जे आत जाण्याची वाट पाहत आहेत. भारतीयांना बाहेर काढण्यासाठी इंडियन एअरफोर्सचे C17 विमान काबूलला पोहोचले आहे. सर्व भारतीय नागरिक गेल्या सहा तासांपासून वाट पाहत आहेत.

ते सुरक्षित ठिकाणी पोहचण्याचा प्रतीक्षेत आहेत. परंतु त्यांना धोकाही वाटत आहे कारण काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर मोठ्या संख्येने तालिबान उपस्थित आहेत. दरम्यान, C130 हरक्यूलिसने ८५ भारतीयांसह उड्डाण केले आहे. 85 भारतीयांना घेऊन ताजिकिस्तानमध्ये उतरल्याची बातमी आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com