Odisha Train Accident: ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांचा आकडा 288 वर; 800 हून अधिक प्रवासी जखमी

बालोसर येथे झालेल्या या भीषण अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Odisha Train Accident News
Odisha Train Accident NewsSaam TV

Odisha train Accident News: देशात ओडिशाीतल बालोसर येथे झालेल्या रेल्वे अपघातामुळे खळबळ उडाली आहे. बहनागा स्टेशनजवळ तीन रेल्वे एकमेकांना धडकल्या. बालोसर येथे झालेल्या या भीषण अपघातात आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने देशभरात शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजून 51 मिनिटांना एक भीषण रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली. या भीषण अपघातात अनेकांनी जीव गमावले आहेत.

Odisha Train Accident News
Sharad Pawar On Odisha Train Accident: 'ओडिशा रेल्वे अपघात गंभीर, चौकशी करा'; जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले...

आतापर्यंत या अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ८०० जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना गोपालपूर, खंटापारा, बालासोर, भद्रक आणि सोरो येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

पंतप्रधानांनी दिली घटनास्थळी भेट

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी भेट दिली.पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी सकाळी अपघाताची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी अपघातस्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. मोदींसोबत अनेक बडे नेते आणि अधिकारीही उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना रेल्वेमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांनी परिस्थितीची माहिती दिली. घटनास्थळी पंतप्रधान मोदींनी मदत आणि बचावकार्य करणाऱ्या जवानांशी संवाद साधला. रेल्वे अपघातस्थळी भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दोषींवर कारवाई होणारच, त्यांना सोडलं जाणार नाही, असं म्हटलं.

ओडिशा अपघाताची चौकशी करा; शरद पवारांची मागणी

ओडिशा अपघातावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. 'ओडिशा अपघात अत्यंत गंभीर आहे. त्याची चौकशी व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे

शरद पवार म्हणाले, 'माजी पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरूंच्या काळात दोन अपघात झाले होते. त्यावेळी मंत्री असलेले लालबहादुर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. नैतिक बाळगली. आजच्या राजकारण्यांना जे वाटत ते करावं. अपघात अत्यंत गंभीर आहे. त्याची चौकशी व्हायला हवी'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com