Galwan Valley: गलवान चकमकीत 38 चीनी सैनिक ठार; चीनचा पोलखोल

जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीन याच्या झालेल्या झटापटीमध्ये चिनचे ३८ सैनिक ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली
Galwan Valley: गलवान चकमकीत 38 चीनी सैनिक ठार; चीनचा पोलखोल
Galwan Valley: गलवान चकमकीत 38 चीनी सैनिक ठार; चीनचा पोलखोल Saam Tv

वृत्तसंस्था: जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यामध्ये (Galwan Valley) भारत आणि चीन याच्या झालेल्या झटापटीमध्ये चिनचे ३८ सैनिक (Soldier) ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही झटापट झाल्यावर चीनने (China) केवळ ४ सैनिक ठार झाल्याचे होते. परंतु, ऑस्ट्रेलियातील (Australia) 'द क्लैक्सन' या वृत्तपत्राने दिलेल्या लेखात चिनचे ४ नाही तर तब्ब्ल ३८ सैनिक या झटापटीवेळेस गलवान नदीमध्ये (Galwan river) वाहून गेल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

यामुळे मृतांचा आकडा लपवणाऱ्या चिनचा बुरखा फाटला आहे. 'द क्लैक्सन' या वृत्तपत्राने दिलेल्या लेखात सांगितले आहे की, "चीनच्या पीपल्य लिबरेशन आर्मीची (People's Liberation Army) भारतीय (Indian) सैनिकांबरोबर झालेल्या झटापटीमध्ये चीनने जो मृतांचा अकडा सांगितला आहे, त्यापेक्षा ९ पटीने जास्त सैनिक ठार झाले आहेत. ही घटना घडली त्यावेळेस चिनचे ३८ सैनिक अंधारामधून वेगाने वाहत असलेली नदी (river) पार करत होते.

हे देखील पहा-

त्यावेळेस हे सर्व सैनिक या नदीत वाहून गेले होते. तब्बल १ वर्षाच्या तपासानंतर सोशल मीडिया (Social media) संशोधकांच्या एका समूहाने याविषयी अहवाल तयार केला आहे. 'द क्लैक्सन' वृत्तपत्राने आपल्या लेखात हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या वृत्तपत्राचे सांगणे आहे की, चीनने जाहीर केलेल्या मृत पावलेल्या ४ सैनिकांपैकी फक्त १ ज्युनियर सार्जंट वांग झुओरन बुडाल्याची नोंद आहे.

Galwan Valley: गलवान चकमकीत 38 चीनी सैनिक ठार; चीनचा पोलखोल
SSC HSC Exam 2022: दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार; राज्य शिक्षण मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अहवालात दिलेल्या माहितीनुसार की, त्या रात्री वांगबरोबर चिनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेले होते. या अहवालामध्ये चिनी ब्लॉगर्सबरोबर चर्चा, काही चिनी नागरिकांकडून मिळालेली माहिती आणि चिनी सैनिकांच्या मोठ्या जीवितहानी विषयी मीडिया रिपोर्ट्सचा १ वर्षभर चाललेला तपास यांचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या सैनिकात झटापट झाली होती. १५ आणि १६ जून २०२० च्या रात्री ही घटना घडली होती.

सीमेवर या झटापटीमध्ये भारताच्या २० सैनिकांना वीरमरण आले होते. तर या झटापतीत चीनने आपले फक्त ४ सैनिक ठार झाल्याचे सांगितले होते. मृतांची खरी संख्या लपवण्याचा प्रयत्न चिनने यावेळी केला होता. परंतु, आता ऑस्ट्रेलियाच्या या वृत्तामुळे त्यांचा खरा चेहरा बाहेर आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com