‘न खाने दूँगा और न पकाने दूँगा’ हा मोदी सरकारचा नवा नारा, केंद्र सरकारवर पटोलेंचा घणाघात

भाजपशासित केंद्र सरकारच्या या निर्णयाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोध केला आहे.
Nana Patole Narendra Modi
Nana Patole Narendra ModiSaam Tv

मुंबई : देशभरात गॅसदरवाढीची (Gas cylinder price) झळ अनेक नागरिकांना बसली होती. मात्र, केंद्र सरकारने २१ मे रोजी एलपीजी गॅसच्या जरवाढीत २०० रुपयांची कपात केली. त्यामुळे उज्ज्वला योजनेंतर्गत दिला जाणारा गॅस सिलिंडर दोनशे रुपयांनी स्वस्त झाला होता. त्यावेळी नागरिकांना काहिसा दिलसा मिळाला होता. परंतु आता पुन्हा केंद्र सरकारने (central government) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करून सर्वसामान्य जनतेला महागाईचा झटका दिला आहे. भाजपशासित केंद्र सरकारच्या या निर्णयाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विरोध केला आहे. एवढा महाग गॅस घेणे किती लोकांना परवडणार आहे ? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे. ‘न खाने दूँगा और न पकाने दूँगा’ हा मोदी सरकारचा (Narendra Modi) नवा नारा बनला आहे, असं म्हणत पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Nana Patole Narendra Modi
...तर मीटर रिडींग एजन्सी आणि अधिकाऱ्यांवर होणार कारवाई, महाविरतण संचालकांचा इशारा

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून महागाईचा आलेख वाढतच आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे. जीवनावश्यक वस्तुंचे भावही सामान्यांच्या हाताबाहेर गेले आहेत. तर गॅसचा भाव सातत्याने वाढवून आता तो १०५० रुपये झाला आहे. काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या काळात २०१४ साली हाच गॅस सिलिंडर ४५० रुपयांना मिळत होता. महागाईची झळ जनतेला बसू नये म्हणून डॉ. मनमोहनसिंह सरकार सबसिडी देत होते पण मोदी सरकारने ही सबसिडीही बंद केली.

Nana Patole Narendra Modi
Eknath Shinde: शिवसेना आमदारांनी का केला उठाव?; मोदींनी कोणता मंत्र दिला?, एकनाथ शिंदेंनी सर्वकाही सांगितलं

मोदींच्या कृपेने आता आपल्या जनतेला जगातील सर्वात महाग एलपीजी गॅस खरेदी करावा लागत आहे. नवीन गॅस कनेक्शन घेणे तर सर्वसामान्य जनतेला अशक्य झाले आहे. नवीन कनेक्शनसाठी आता २२०० रुपये मोजावे लागतात त्यासोबत सिक्युरिटीच्या नावाने ४४०० रुपये द्यावे लागतात, रेग्युलेटरही १०० रुपयांनी महाग केला आहे. उज्ज्वला योजनेखालील ९ कोटी गॅस कनेक्शन दिल्याचे केंद्र सरकारचे आकडे पाहता या ९ कोटीमधील किती लोकांना एक हजार रुपयांचा गॅस परवणार आहे? या योजनेतील लोकांनी पुन्हा गॅस सिलिंडर घेतलेला नाही. उज्ज्वला योजनेच्या नावाखाली गॅस कनेक्शन दिले व त्यांना मिळणारे केरोसिन बंद केले. आता एक हजार रुपयांचा गॅस परवत नाही व केरोसिनही बंद केल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याचे चित्र आहे.

देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे, डॉलरच्या तुलनेत रुपया दररोज घसरत आहे. महागाईने जनतेला जगणे कठीण झाले आहे मात्र मोदी सरकार व मोदींच्या मित्रांचे मात्र अच्छे दिन आले आहेत. पेट्रोल डिझेलवरील करातून आधीच २६ लाख कोटी रुपयांची लूट केली असून आता देशांतर्गत तेल उत्पादनावर अतिरिक्त लाभ कर लावून सरकारला आणखी नफा मिळणार आहे. सरकार स्वतःची तिजोरी भरून जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटत आहे, असेही पटोले म्हणाले.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com