Amarinder Singh: कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश; महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याची शक्यता

कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा पंजाब लोक कॉंग्रेस पक्ष देखील भाजपमध्ये विलीन झाला आहे.
Captain Amarinder Singh Join BJP
Captain Amarinder Singh Join BJPSaam TV

शिवाजी काळे -

नवी दिल्ली: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) यांनी आज केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि किरण रिजीजू यांच्या उपस्थित भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. तसंच सिंह यांचा पंजाब लोक कॉंग्रेस पक्ष देखील भाजपमध्ये विलीन करण्यात आला आहे.

त्यामुळे आता भाजपला (BJP) कॅप्टन यांच्या रूपाने पंजाबमध्ये समाजमान्य चेहरा मिळाला आहे. तीन कृषी कायद्याने पंजाबमध्ये पक्षाचं मोठं नुकसान झालं ते भरून काढण्याची जबाबदारी कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर राहणार आहे. कॅप्टन यांच्यावर महाराष्ट्राच्या राज्यपाल (Governor) पदाची जबाबदारी? येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाहा व्हिडीओ -

कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे वय झालं आहे. तसंच त्यांना पाठीचा त्रास असल्याने पक्षाची मोठी जबाबदारी देणं शक्य नाही. त्यामुळे त्यांना राज्यपालासारखं घटनात्मक पद दिलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर कॅप्टन अमरिंदर सिंह यांना राज्यपाल पदाची जबाबदारी दिली तर त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल केलं जाऊ शकते. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कॅप्टन यांच्यासोबत प्रवेश केलेल्या इतर माजी आमदारांवर पक्ष संघटनेची जबाबदारी दिली जाणार आहे.

नरेंद्र सिंह तोमर आणि किरण रिजीजू यांच्या उपस्थित प्रवेश का?

पंजाब हा कृषीप्रधान प्रदेश आहे. तीन कृषी कायद्यादरम्यान कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. तसंच नरेंद्रसिंह तोमर हे पंजाबचे प्रभारी आहेत. त्यामुळं कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या उपस्थित प्रवेश. आगामी काळात हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका असून सिंह यांचं हिमाचल प्रदेशच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळं हिमाचलचे असलेले किरण रिजीजू कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या प्रवेशाला उपस्थित होते.

अमित शहा, जे पी नड्डा यांच्या अनुपस्थित प्रवेश

कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पक्षप्रवेशाला अमित शहा (Amit Shah), जे. पी नड्डा उपस्थित राहतील. असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा प्रवेश झाल्याने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या प्रवेशाला हजेरी का लावली नाही याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपात प्रवेश केल्यानंतर बोलताना कॅप्टन अरमिंदर सिंग म्हणाले, मी ५२ वर्षांपासून राजकारणात आहे. आमचा पंजाब बॉर्डरवर आहे, मी पाकिस्तानची भूमिका जवळून पाहिली आहे. पण, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी सीमेवरच्या परिस्थितीबाबत योग्य निर्णय घेतले. मी आज भाजपमध्ये प्रवेश केला, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) , गृहमंत्री अमित शाह आणि जे. पी नड्डा (J. P Nadda) यांचे आभार मानतो असं कॅप्टन म्हणाले.

Captain Amarinder Singh Join BJP
संजय राऊतच पडद्यामागील सूत्रधार; पत्रा चाळ प्रकरणात ईडीने कोणकोणते आरोप केले?

दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असता तरी त्यांची पत्नी अद्याप कॉंग्रेसमधेच आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांची बायको कॉंग्रेसची खासदार आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही. यावर बोलताना कॅप्टन सिंह म्हणाले, गरजेचं नाही की, पती जे करेल ते बायकोने केलंच पाहिजे असं नाही असंही ते यावेळी म्हणाले.

कॅप्टन अमरिंदर सिंह महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?

कॅप्टन अमरिंदर सिंह हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होण्याची शक्यता आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आज त्यांचा पंजाब लोक कॉंग्रेस पक्ष भाजप मध्ये विलीन केला. भाजपमध्ये पक्ष विलीन करताना त्यांनी त्यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रीपदाची मागणी केली होती. त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा भाजप प्रवेश लांबला होता. भाजपने त्यांच्या या मागण्या नाकारत त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची ऑफर दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर घटनात्मक पदाची जबाबदारी देणार असल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय मंत्री अमित शहा त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी अनुपस्थित असल्याचं कळतं आहे.

Captain Amarinder Singh Join BJP
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर वन, युतीला जनतेचा स्पष्ट कौल, बावनकुळे म्हणाले...

भगतसिंह कोश्यारी यांचं राज्यपाल पद जाणार?

भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी घटनात्मक पदावर असताना अनेक घटनात्मक संकेत मोडले. १२ आमदारांच्या प्रलंबित यादीपासून शिंदे सरकारच्या स्थापनेवेळी राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयात भाष्य करण्यात आलं. महाराष्ट्रातील अनेक महापुरूषांबाबत केलेल्या वक्तव्यामुळं भगतसिंह कोश्यारी यांना जनतेच्या मोठ्या रोशाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळं भगतसिंह कोश्यारी यांना दुसरी जबाबदारी देऊन त्यांना कार्यमुक्त केले जाण्याची शक्यता आहे. कोश्यारी हे २०१९ पासून महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com