
भारत की इंडिया... देशभरात सध्या हा विषय सर्वाधिक चर्चिला जातोय. देशाचं नाव आता इंडिया ऐवजी भारत करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्याचीही चर्चा आहे.
येत्या १८ ते २२ सप्टेंबर या काळात मोदी सरकारनं संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे. या विशेष अधिवेशनात देशाचं नाव बदलण्याचं विधेयक मोदी सरकारकडून सादर केले जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असं म्हटलं आहे. जी २० च्या डिनर निमंत्रण पत्रिकेवर तसा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.
मात्र भारतात सुरु असलेल्या या नामांतराच्या चर्चेत पाकिस्तान मोठी संधी साधण्याची शक्यता आहे. कारण इंडिया नाव वगळलं तर त्यावर पाकिस्तान दावा करु शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पाकिस्तानच्या लोकल मीडिया रिपोर्ट्सनुसार, संयुक्त राष्ट्रात इंडिया नावाची मान्यता अधिकृतपणे रद्द झाल्यास पाकिस्तान इंडिया नावावर दावा करु शकतो. पाकिस्तान अनेक वर्षांपासून सांगत आला आहे की इंडिया हे नाव सिंधू क्षेत्राशी संबंधित आहे. त्यामुळे जर इंडिया नाव वगळलं तर कदाचित पाकिस्तान यावर दावा करु शकतो. (Latest News Update)
South Asia Index reportच्या रिपोर्टनुसार भारताने संयुक्त राष्ट्र स्तरावर इंडिया नाव वगळलं तर पाकिस्तान यावर दावा करु शकतो. रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान मोहम्मद अली जिन्ना यांनी देखील इंडिया नावाला विरोध केला होता. त्यांना हिंदुस्थान किंवा भारत नाव सुचवलं होतं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.