Corona Virus Reason : लस घेऊनही कोरोना पुन्हा का वाढतोय? तज्ज्ञांनी फक्त ५ पॉइंट्समध्ये केला खुलासा

नागरिकांनी कोरोनाची लस घेतलेली असताना देखील त्यांना कोरोनाची लागण कशी काय होतेय असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे.
Corona Virus
Corona VirusSaam Tv

Expert Comment on Covid : गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे नागरिक त्रस्त होते. आता काही दिवसांआधी कोरोनाची रुग्ण संख्य अटोक्यात येत आहे असे दिसत असताना पुन्हा एकदा नव्या व्हेरीएंटने डोकं वर काढलं आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. नागरिकांनी कोरोनाची लस घेतलेली असताना देखील त्यांना कोरोनाची लागण कशी काय होतेय असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. (Covid)

भारतात २०२२ मध्ये कोरोनाची तिसरी लाट आली होती. त्यावेळी १०० ते २०० रुग्ण रोजचे मिळत होते. मात्र सध्या ही रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसाला तब्बल ३ ते ४ हजार रुग्ण सापडत आहेत. भारतामध्ये सर्व नागरिकांनी दोन वेळा कोरोनाची लस घेतली आहे. मात्र तरी देखील कोरोनाची लागण होताना दिसत आहे? रुग्ण संख्या वाढण्यामागचं मुख्य कारण काय आहे याबाबत तज्ज्ञांनी काही निरिक्षणे नोंदवली आहेत.

Corona Virus
Bhandara Crime News: प्रेमप्रकरणातून भांडण; चाकूच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यू, दुसरा गंभीर

बुस्टर डोसपासून अद्याप नागरिक वंचित

भारतामध्ये सर्व नागरिकांनी कोरोनाच्या दोन्ही लस घेतल्या आहेत. मात्र तिसरी लस म्हणजे बुस्टर डोस अद्यापही अनेक नागरिकांना मिळाला नाही. काही ठिकाणी तर बुस्टर डोस उपलब्ध नसल्याने तेथील केंद्र देखील बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटची नागरिकांना पटकन लागण होत असल्याचे निरिक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

नवीन व्हेरीएंट

तज्ज्ञांच्या मते कोरोना विषाणूमध्ये दर महिन्याला बदल होत आहे. प्रत्येक महिन्यात कोरोनाचा नवा व्हेरीएंट पहायला मिळतोय. त्यामुळे लसीकरण झालेले असून देखील नागरिकांना कोरोना होत आहे. नवा विषाणू हा आधीच्या विषाणूपेक्षा अधिक घातक आहे. त्यामुळे शरीरामध्ये लस असली तरी हा विषाणू त्यावर मात करत आहे. सध्या BB.1.16 हा सक्रिय विषाणू आहे.

Corona Virus
Crime News : जीव वाचवला म्हणून पित्यानेच केली मुलीची हत्या; धक्कादायक घटनेनं जम्मू-काश्मीर हादरलं

निर्बंधांमध्ये सूट

देशात कोरोना रुग्ण संख्या कमी झाली आणि मास्क सक्ती संपल्यावर अनेक व्यक्ती आपल्याला हवे तसे राहू लागल्या. सण उत्सवासह सर्वत्र मोठ्या संख्येने नागरिक जमू लागले. तसेच कोरोना पूर्णपणे नष्ट झाल्यासारखे नागरिक मास्कशिवाय फिरू लागले. त्यामुळे देखील कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे.

घेतलेल्या लसची १०० टक्के खात्री नाही

कोरोनाची लस सर्व नागरिकांनी घेतली आहे. यामध्ये ज्यांनी बुस्टर डोस देखील घेतलाय त्यांना देखील कोरोनाची लागण होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे जगभरात ज्या काही कोरोना लस बनवण्यात आल्या आहेत त्या १०० टक्के कोरोना विषाणूवर मात करु शकत नाहीत.

सर्वाधिक धोका कोणाला

तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये सर्वात जास्त धोका कोणाला असेल हे सांगता येणार नाही. कारण लस घेतलेल्या व्यक्तींना देखील कोरोना होत आहे. ज्या व्यक्तींनी बुस्टर डोस घेतलेला नाही अशा व्यक्तींना याचा जास्त धोका असण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com