
आज दिवसभर सर्वत्र 'इंडिया'चे नाव बदलून 'भारत' ठेवण्याची चर्चा सुरु असल्याचं दिसून आलं. काही दिवसांनी विरोधकांनी एकत्र येऊन इंडिया आघीडीची स्थापना केली. या आघाडीवर भाष्य करताना सत्ताधारी भाजपने म्हटलं होतं की, ईस्ट इंडिया कंपनी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या नावांशीही इंडिया जोडलेला आहे.
या नावाबाबतचा वाद कुठपर्यंत जाईल? तसेच घटनेत इंडियाचे नाव बदलून भारत करण्यात येईल की नाही, संसदेत विधेयक आणून काय निर्णय घेतला जाईल, या सगळ्याची आज जोरदार चर्चा झाली. इंडियाचे नाव जर भारत झाले, तर यामुळे कोणकोणत्या गोष्टीत बदल होऊ शकतो, याचा तुम्ही विचार केला आहे का? इंडिया हा शब्द असलेले प्रत्येक नाव बदलले जाईल का?
इंडियाचे नाव बदललं तर यामुळे परदेशी खेळाडूही दु:खी होऊ शकता, ज्यांनी आपल्या मुलीचे नाव देशाच्या नावावरून 'इंडिया' ठेवले आहे. याच्यामध्ये न्यूझीलंडचा उद्योगपती आणि माजी वेगवान गोलंदाज डिऑन नॅश यांचाही समावेश आहे. ज्याने आपल्या मुलीचे नाव इंडिया लिली नॅश ठेवले आहे. (Latest Marathi News)
इंडिया हे नाव बदललं तर याचा परिणाम भारतातील सर्व शैक्षणिक आणि संशोधन संस्थांच्या नावावरही होणार. त्यांच्यातील इंडिया हा शब्द काढून टाकल्यावर त्यांची नावे कशी असतील? एवढेच नाही तर भारताची ओळख आणि अभिमान बनलेल्या इंडिया गेट किंवा गेटवे ऑफ इंडियाचे नाव काय असेल. इंडिया गेटला भारत द्वार म्हणायचे का?
अलीकडेच चांद्रयान-३, आदित्य एल-1 मिशनमुळे जगभरात इस्रोचे कौतुक होत आहे. आता त्याचे नाव ISRO वरून BSRO केले जाईल का? सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.