नवी दिल्ली: बिहारमध्ये काँग्रेस (Congress) मोठे बदल करत आहे. बिहार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मदन मोहन झा यांच्या राजीनाम्यानंतर नव्या अध्यक्षा वरुन राजकारण तापलं आहे. बिहारमधून एक बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे बिहारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. बिहार काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची माळ कन्हैया कुमार यांच्या (Kanhaiya Kumar) गळ्यात पुडणार असल्याचे बोलले जातं आहे.
बिहारमध्ये राजद आणि काँग्रेस (Congress) वेगळे आहेत. याचे एक कारण म्हणजे कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) काँग्रेसमध्ये आले असल्यामुळे असल्याचे सांगितले जात आहे. राहुल गांधी यांनी याला होकार दिल्यास कन्हैया कुमार हा बिहार काँग्रेसचा अध्यक्ष होईल, असं बोललं जात आहे.
कन्हैया कुमार हे भूमिहार जातीतून येतात. बिहारमध्ये (Bihar) काँग्रेसला भाजपला आव्हान द्यायचे असेल, तर कन्हैया कुमारशिवाय पक्षाकडे पर्याय नाही. कन्हैयांच्या प्रवेशामुळे सध्या भाजपध्ये असलेले बिहारमधील भूमिहार तरुण काँग्रेसमध्ये येऊ शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मतं आहे.
बिहार काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेकजण आहेत. सदाकत आश्रमाचे नावही चर्चेत आहे. यासोबतच दलितांमधून आलेल्या मीरा कुमार यांचेही नाव बिहार प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत पुढे आहे. त्याचबरोबर दलित नेत्यांमध्ये तारिक अन्वर, आमदार राजेश कुमार आणि विधिमंडळ पक्षाचे माजी नेते अशोक राम यांचीही नावं चर्चेत आहे.
Edited By- Santosh Kanmuse
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.