रश्मी पुराणीक -
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज देशातील बहुचर्चीत आणि वादग्रस्त तीन कृषी कायदे (Agricultural laws) मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर सर्वच विरोधकांनी मोदी सरकार झुकलं म्हणत केंद्रावर टीका केल्या. तसेच हे उशीरा सुचलेलं शहाणपण तर काहींनी उत्तर प्रदेशात येऊ घातलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती कायदे मागे घेतले असल्याची टीका केली. अशातच केंद्रावर परखड आणि टोकाच्या टीका करणारे शिवसेना खासदार संजय राऊत (ShivSena MP Sanjay Raut) यांनी तर मोदींना लाल किल्ल्यावरून 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून (Red Fort) 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी तसेच त्यांना मदतीची घोषणा कर शेतकऱ्यांविरोधात केलेल्या केसेस मागे घेण्याची राऊतांनी आपल्या ट्विट (Tweet) मध्ये मागणी केली आहे.
केंद्र सरकारनं (Central Government) मंजूर केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या आंदोलनात कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या दोखील (Farmers commit suicide) केल्या होत्या. दरम्यान गुरुनानक जयंतीनिमित्त आज पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. मोदींनी ते कृषी कायदे रद्द करीत शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. याच पार्श्वभूमीवरती राऊतांनी ट्वीट करत वरिल मागण्या केल्या.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.