
Mumbai High Court : न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांचा वकील-न्यायाधीश यांच्या माध्यमातून निवाडा लवकरात लवकर कसा करता येईल याबद्दल प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्ये न्यायमूर्ती रेवती मोहिते - डेरे यांनी व्यक्त केले आहे. राजगुरूनगर येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
रविवारी राजगुरुनगर (rajgurunagar) येथे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या विस्तार इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी न्यायाधीश आणि वकील (Lawyer) मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशात अनेक छोट्या-मोठ्या घटनांवर न्यायालयात खटले सुरू आहेत. वर्षांनुवर्षे हे खटले सुरू असल्याने अनेक नागरिक मेटाकूटीला आलेत. काही व्यक्तींना पैशांची चणचण भासत असल्याने त्यांनी कोर्टातील वाऱ्या बंद केल्या आहेत. तर अनेकांनी केस बंद न करताच विषय सोडून दिला आहे.
यामुळे उद्घाटन सोहळ्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते - डेरे यांनी उपस्थित वकील आणि न्यायाधीशांना त्यांचे कर्तव्य सांगत काही सूचना केल्या आहेत. पीडितांना न्याय मिळवून देणे हे वकीलांचे कर्तव्य आहे. वकील-न्यायाधीश यांच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणाचा निवाडा लवकरात लवकर कसा करता येईल याबद्दल प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.
समाजातील १० टक्के नागरिकांचे विना मोबदला काम करण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांना न्याय मिळवून द्या असे आवाहन मोहिते-डेरे यांनी केले. प्रत्यक्षात न्यायाधीश आणि वकिलांनी असे केल्यास बहुसंख्य पीडितांना न्याय मिळण्यास मदत होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.