नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अचानक आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांना यात आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेका जण जखमी झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehical) बनवणाऱ्या तीन कंपन्यांनी सुरक्षेच्या कारणात्सव आपल्या बाईक्स परत मागवल्या आहेत. १७ एप्रिलला ओकिनावा ऑटोटेक (okinawa autotech) या ईव्ही कंपनीने ३२१५ गाड्या परत मागवल्या, त्यानंतर २१ एप्रिलला प्योर ईव्ही (Pure EV) या कंपनीने आपल्या २००० गाड्या परत मागवल्या. आता ओला इलेक्ट्रिक (OLA Electric) या कंपनीने आपल्या १४४१ स्कूटर परत मागवल्या आहेत. (Ola Electric recalls 1,441 scooters after Pune fire incident)
हे देखील पाहा -
ओला कंपनीने आपल्या निवेदनात काय म्हटलं?
ओला इलेक्ट्रिकने आपल्या निवेदनात म्हटलं की, "सावधगिरी म्हणून, आम्ही त्या बॅचच्या स्कूटर्सची तपशीलवार तपासणी करू आणि म्हणूनच आम्ही स्वेच्छेने 1,441 वाहने परत मागवली आहेत." "आमचे सेवा अभियंते या स्कूटर्सची चाचणी करतील आणि बॅटरी सिस्टमची व्यवस्थित तपासणी करतील," असे कंपनीने म्हटले आहे. ओला इलेक्ट्रिकने सांगितले की त्याची बॅटरी-कनेक्टेड सिस्टीम आधीपासूनच नियमांनुसार कार्य करते आणि AIS 156 साठी चाचणी केली गेली आहे. हे भारतासाठी अलीकडेच प्रस्तावित केलेले मानक आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, तिची स्कूटर्स युरोपियन स्टँडर्ड ECE 136 चे पालन करते. अलीकडे इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तेव्हापासून, उत्पादकांना त्यांची वाहने परत मागवावी लागली आहेत. (Ola Electric Scooter recalls News Updates)
त्याचप्रमाणे ओकिनावा ऑटोटेक या ईव्ही कंपनीनेही 3,000 हून अधिक युनिट्स परत बोलावल्या आहेत. त्याच वेळी, PureEV ने सुमारे 2,000 युनिट्स परत मागवले आहेत. इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना पाहता सरकारला समिती स्थापन करावी लागली. वाहनांना आग लागण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा आढळल्यास दंड आकारला जाईल, असा इशारा कंपन्यांना देण्यात आला आहे. (Pure EV recalls 2000 electric scooters in view of increasing fire accidents)
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या सूचना -
इलेक्ट्रिक वाहनं अचानक पेट (electric vehicle explosion) घेत आहेत, याबाबत गडकरी म्हणाले होते की, गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या अनेक दुर्घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांमध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत हे सर्वात दुर्दैवी आहे. या घटनांची चौकशी करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी करण्यासाठी आम्ही तज्ञांची समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अहवालाच्या आधारे आम्ही दोषी असलेल्या कंपन्यांनी आवश्यक ते आदेश जारी करू. त्याप्रमाणे आम्ही लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी गुणवत्ता-केंद्रित मार्गदर्शक तत्त्वे जारी करू असं गडकरी म्हणाले होते.
गडकरी म्हणाले होते की, कोणत्याही कंपनीने इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या प्रक्रियेत निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्यास त्या कंपनीला मोठा दंड (Penalty) आकारला जाईल आणि सर्व सदोष वाहने परत मागवण्याचे आदेशही दिले जातील असा कडक शब्दांत गडकरींनी इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांवर आपली नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, इलेक्ट्रिक वाहन कंपन्यानी दोषपूर्ण वाहनांच्या सर्व बॅच ताबडतोब परत मागवण्यासाठी त्वरीत कारवाई करावी असं आवाहन करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार प्रत्येक प्रवाशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे असं गडकरी म्हणाले होते. गडकरींच्या या सूचनेनंतर आता ईव्ही कंपन्यांनी आपल्या वाहनांना परत मागवत त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी काम सुरु केले आहे.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.