दिवाळखोरी आणि कर्जामुळे 3 वर्षात 16,000 लोकांची आत्महत्या; सरकारने दिली माहिती

दिवाळखोरी आणि कर्जामुळे लोकांनी आपला जीव दिले असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं सन 2020 मध्ये दिवाळखोरी किंवा कर्जामुळे 5,213 लोकांनी आत्महत्या केल्या तर 2019 मध्ये 5,908 आणि 2018 मध्ये 4,970 लोकांनी आत्महत्या केली आहे.
दिवाळखोरी आणि कर्जामुळे 3 वर्षात 16,000 लोकांची आत्महत्या; सरकारने दिली माहिती
दिवाळखोरी आणि कर्जामुळे 3 वर्षात 16,000 लोकांची आत्महत्या; सरकारने दिली माहितीSaam TV

नवी दिल्ली : 2018 ते 2020 दरम्यान दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे देशात जवळपास 16,000 हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत तर बेरोजगारीमुळे 9,140 लोक मरण पावले असल्याची माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nityananda Rai) यांनी राज्यसभेत दिली आहे.

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत (RajyaSabha) हे एका लेखी प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी ही आकडेवारी दिली आहे. त्यांनी सांगितले की, 2020 मध्ये 3,548, 2019 मध्ये 2,851 आणि 2018 मध्ये 2,741 लोकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्याचही त्यांनी सांगितलं.

दिवाळखोरी आणि कर्जामुळे 3 वर्षात 16,000 लोकांची आत्महत्या; सरकारने दिली माहिती
FB Live करत नवऱ्याने पिलं विष; अडवायला गेलेल्या पत्नीचा मृत्यू, नवऱ्याची प्रकृती चिंताजनक

दरम्यान, दिवाळखोरी आणि कर्जामुळे लोकांनी आपला जीव दिले असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं सन 2020 मध्ये दिवाळखोरी किंवा कर्जामुळे 5,213 लोकांनी आत्महत्या केल्या तर 2019 मध्ये 5,908 आणि 2018 मध्ये 4,970 लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com