
PM Kisan Yojna : केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान निधीची रक्कम वाढवण्याची घोषणा करू शकतात.
पीएम किसान योजनेअंतरर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये मिळतात. या रकमेत वाढ होण्याची सूत्रांची माहिती आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकार हा निर्णय घेऊ शकते. 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याकडे शेतकरी वर्गाचं लक्ष असेल. (Latest Marathi News)
सध्या पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिले जात आहेत. मात्र आता शेतकऱ्यांना तीन ऐवजी चार हप्ते मिळण्याची शक्यता आहे. सध्या दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये ट्रान्सफर केले जातात. मात्र बदलानंतर दर तिमाहीला 2000 रुपये दिले जातील. म्हणजेच शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी 8000 रुपये वार्षिक देण्यात येतील.
पीएम किसान योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या पैशांसाठी मोठा हातभार लागतो. बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना रोख रकमेची गरज असते. त्यात आता पीएम किसान योजनेची रक्कम वाढवल्यास एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा 2000 रुपयांचा हप्ता येऊ शकतो.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.