नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी सोमवारी दिलेल्या माहितीवरून कोरोनाच्या Corona संकटकाळातही भारत पहिल्यांदाच कृषी निर्यातीत पहिल्या दहा देशांच्या यादीमध्ये आहे. आता भारताची ओळख एक कृषी निर्यातक देश म्हणून निर्माण होत आहे.
हे देखील पहा -
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा नववा हप्ता जारी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला डाळी आणि खाद्यतेलाच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाद्यतेलात आत्मनिर्भरता आणण्यासाठी मिशन-ऑइल पाम मिशनची घोषणा केली आहे. यामध्ये ११ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीची घोषणा यावेळी करण्यात आली आहे. सरकार आणि शेतकरी यांच्या समन्वयामुळे देशातील अन्न भांडार भरलेले आहे असे यावेळी ते म्हणाले.
सुरुवातीच्या काळात डाळ आयात करावी लागत असे, मात्र आता या क्षेत्रात खूप बदल झाले आहेत. गेल्या ६ वर्षात डाळीच्या उत्पादनात आता जवळपास ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. जे काम आपण डाळींसंदर्भात करुन दाखवले आता तेच काम खाद्यतेलांच्या उत्पादनाबाबतीत करायचा आहे असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
Edited By - Shivani Tichkule
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.