Bihar News : बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत दिलेल्या जाणाऱ्या मिड ड मील म्हणजेच मध्यान्ह भोजनामध्ये साप आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिहारमधील अररिया येथील सरकारी शाळेत ही घटना घडली आहे.
शाळेतील माध्यान्ह भोजनात मृत साप आढळून आल्याचा आरोप मुलांच्या नातेवाईकांनी केला आहे. साप सापडला तोपर्यंत 100 हून अधिक मुलांनी ते अन्न खाल्ले होते. मध्यान्ह भोजन खाल्ल्याने 100 हून अधिक मुले आजारी पडली आहेत.
घडलेला प्रकार कळताच सर्व मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मुलांवर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर शाळा व्यवस्थापनावर लवकरात लवकर कारवाई करावी, असं आवाहन करण्यात येत आहे. (Latest News Marathi)
शाळेच्या मुख्याध्यापकांना 48 तासात तर अन्नपुरवठा करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या मालकाला 48 तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश विभागिय शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहे. ही स्वयंसेवी संस्था जिल्ह्यातील 60 शाळांना अन्न पुरवते. हे प्रकरण गंभीर असून चौकशी अहवाल आल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
काही दिवसांपूर्वी आढळली होती पाल
यापूर्वी 18 मे रोजी बिहारमध्ये मिड-डे मीलमध्ये पाल आढळली होती. बिहारच्या सारण जिल्ह्यात 18 मे रोजी मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर किमान 35 शाळकरी मुले आजारी पडली. घटना दुंद्री टिकुरिया गावातील शाळेत घडली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.