आसाम राज्याला महापुराचा फटका; २० जिल्हे पुराने प्रभावित...(पाहा Video)

पूर आणि पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली
Assam Flood News
Assam Flood News Saam Tv

नवी दिल्ली: राजधानी दिल्ली, यूपीसह उत्तर भारतात बहुतांश राज्यांतील (states) लोक सध्या कडक उन्हामुळे हैराण झाले आहेत. त्यांना उन्हाचा त्रास होत आहे. आता पाऊस (rain) लवकर येण्याची प्रतीक्षा आहे. पण देशाचा एक भाग असाही आहे, जिथे उष्मा नाही, पूर (Flood) आणि पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात महापुराचा फटका बसला आहे. आसाममध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पूर आला आहे. यामुळे भूस्खलनाची स्थिती निर्माण झाली आहे.

पाहा व्हिडिओ-

आसामच्या (Assam) २० जिल्ह्यांमध्ये जवळपास २ लाख लोकांना पुराचा मोठा फटका बसला आहे. प्रशासनाच्या (administration) वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिमा हासाओ (Dima Hasao) जिल्ह्यात डोंगराळ प्रदेशात भूस्खलनामुळे रेल्वे आणि रस्ते संपर्क तुटल्यानं त्याचा उर्वरित राज्याशी संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे रेल्वे आणि रस्ते संपर्क तुटला आहे. सोशल मीडियावर (Social media) लोक आसाममधील पूरग्रस्तांसाठी प्रार्थना करत आहेत. आसामच्या लोकांच्या वेदना उष्णतेची भावना दूर करतील.

आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे की होजईमधील ७८,१५७ आणि कछारमधील ५१,३५७ लोकांना पुराचा फटका बसला आहे. जोरदार भूस्खलन आणि संततधार पावसामुळे ट्रॅकवर पाणी साचले असल्याची माहिती ईशान्य सीमा रेल्वेने अधिकाऱ्यांनी दिली आहे. आसामच्या लुमडिंग-बदरपूर हिल विभागात २ दिवसांपासून २ गाड्या अडकल्या होते.

Assam Flood News
लाचखोर शिक्षणाधिकारी आणि अधीक्षक निलंबित

हवाई दलाच्या मदतीने सुमारे २८०० प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. दक्षिण आसाम, त्रिपुरा आणि मिझोरामसाठीचे रेल्वे मार्ग गेल्या २ दिवसांपासून बंद आहेत. गुवाहाटीची वाईट स्थिती निर्माण झाली आहे. गुवाहाटीतील बहुतांश भागात ४-५ दिवसांपासून पाणी साचले आहे. शुक्रवारपासून राज्यभरात पाऊस पडत आहे. शहरातील अनेक भागात रस्त्यांवर चिखल साचल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

गुवाहाटी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक ए के भगवती यांनी शहरी पुरावर खूप अभ्यास केला आहे. ते म्हणाले की, ज्या भागात पूर आणि पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे ते एकेकाळी ओलसर होते. शहर वाढल्याने सखल भागात बांधकामेही वाढली. जलद शहरीकरणामुळे पाणथळ जागा कमी झाल्या आणि काँक्रीटचे क्षेत्र वाढले ज्यामुळे शहरात पूर आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com