मोदी सरकारवर सोनियांचा हल्लाबोल; म्हणाल्या, भाजपनं लोकांना भीतीच्या छायेखाली...
नवी दिल्ली: चार राज्यात विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस (Congress) आता पक्षात महत्वपूर्ण बदल करत आहे. राजस्थानमध्ये आजपासून तीन दिवस काँग्रेसची चिंतन बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित आहेत. यावेळी गांधी यांनी आत्मचिंतन बैठकीच्या उद्घाटन भाषणात भाजपवर (BJP) आरोप करत टीका केली. 'भाजपने आपल्या देशवासीयांना भीतीच्या वातावरणात जगण्यास भाग पाडले आहे, असा आरोप सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी भाजपवर केला. (Sonia Gandhi Latest Marathi News)
'नव संकल्प शिबीरात आपल्याला आरएसएस, भाजप (BJP), आणि त्यांच्या धोरणांमुळे देशासमोर असलेल्या आव्हानांवर चर्चा करायची आहे. सध्या मोदी सरकार देशातील अल्पसंख्याकांवर अन्याय करत आहे, असा आरोपही गांधी यांनी केला. पक्ष आणि वैयक्तिक पातळीवर आपल्या सर्वांसाठी चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे. पक्षात बदल ही काळाची गरज असून, आपल्या कामाची पद्धतही बदलण्याची गरज असल्याचे गांधी म्हणाले. पक्षासाठी आता सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे असंही सोनिया गांधी (Sonia Gandhi) म्हणाले.
आपण एकत्रित प्रयत्नानेच बदल घडवू शकतो, पक्षाने आपल्याला खूप काही दिले आहे. आणि आता आपल्याला पक्षाला काहीतरी द्यायची वेळ आली आहे. मी पक्षातील पदाधिकाऱ्यांना विनंती करते की, त्यांनी शिबिरात खुलेपणाने आपले मत मांडावे. त्यातून एक मजबूत पक्ष आणि पक्षातील एकतेचा संदेश देशात गेला पाहिजे, असंही सोनिया गांधी (Sonia Gandhi) म्हणाले.
Edited By- Santosh Kanmuse
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.