Viral News : माझं आभाळ वाकलं गड्या... प्रेम केला एवढाच गुन्हा; बायको ३५ वेळा पळून गेली तरी...

कृष्ण मुरारी गुप्ता असं या पीडित पतीचं नाव आहे. पतीने याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्येही तक्रार नोंदवली आहे.
BIHAR NEWS
BIHAR NEWS Saam TV

पाटना: पती-पत्नीचं नातं म्हटलं की रुसवे-फुगवे आलेच. अनेकदा पत्नी रागाने माहेरी देखील निघून जाते. मात्र बिहारमध्ये एक पत्नी गेल्या पाच वर्षात जवळपास 35 वेळा पळून गेल्याची अजब घटना समोर आली आहे. एवढं असूनही पतीचं पत्नीवरचं प्रेम काही कमी झालेलं नाही.

पीडित पतीने आता पत्नीला शोधण्यासाठी लोकांनाच आवाहन केलं आहे. पती आपल्या दोन मुलांसह पत्नीचा शोध घेत फिरत आहे. कृष्ण मुरारी गुप्ता असं या पीडित पतीचं नाव आहे. पतीने याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्येही तक्रार नोंदवली आहे. (Viral News)

BIHAR NEWS
PM Kisan Yojna: शेतकऱ्यांना 1 एप्रिलपासून पीएम किसान योजनेत जास्त निधी मिळणार? 6 हजारांऐवजी मिळणार...

कृष्ण मुरारीने पोलिसात तक्रार करताना म्हटलं आहे की, पत्नी 30 ते 35 वेळा पळून गेली आहे. दोन मुलं लहान आहेत. मोठा मुलगा चार वर्षांचा आहे आणि लहान मुलगी चार महिन्यांची आहे. पत्नी होती तर नोकरी करता येत होती. मात्र आता पत्नी गेल्याने नोकरीही करता येत नाहीये. त्यामुळे भीक मागण्याची वेळ माझ्यावर आली आहे. जर माझी पत्नी परत आली नाही तर माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळी येईल.

BIHAR NEWS
Flights Shutdown in US : अमेरिकेत काहीतरी भयंकर घडलंय? हजारो विमानं एकाचवेळी जमिनीवर!

कृष्ण मुरारीने 2017 मध्ये प्रेमविवाह केला होता. लग्नाच्या वर्षभरातच पत्नी पळून गेली होती. त्यानंतर अनेकदा पत्नी सोडून गेली होती. अनेकदा मध्यस्थी करुन तिला पुन्हा आणलं गेलं. मात्र यावेळी पत्नीचा शोध लागत नाहीये. पत्नी कुठे गेली याची माहिती देखील मिळत नाहीये, अस कृष्ण मुरारीने सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com