
रश्मी पुराणिक
गेल्या काही दिवसांपासून देशात तापमानात घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून थोडासा दिलासा मिळाला असला तरी आता तापमानाचा पारा वाढणार आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की,आजपासून दिल्ली, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये तापमान पुन्हा 40 अंशांच्या पुढे जाऊ शकते. त्यामुळे उत्तर भारतातील जनतेला पुन्हा उन्हाचा सामना करावा लागू शकतो.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, राजस्थानमध्ये 9-13 मे दरम्यान, 10 ते 12 मे दरम्यान पश्चिम राजस्थानमध्ये वेगळ्या ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट राहील तर गुजरात राज्यात 9, 10 मे पर्यंत लाट राहील. 9-13 मे दरम्यान विदर्भ, मध्य प्रदेशमध्ये तर, 10-13 मे दरम्यान हरियाणा, पंजाब मध्ये तर 11-13 मे दरम्यान दिल्लीमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक भागातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
सांगण्यात आले आहे की, दिल्लीत 11 ते 13 मे पर्यंत उष्णतेची लाट राहील, शनिवारी सकाळी दिल्लीचे किमान तापमान 23.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कमाल तापमान 41 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. 11 मे ते 13 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या काळात कमाल तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
हे देखील पाहा-
हवामान खात्यानुसार, राज्यातील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव आजपासून संपेल आणि पुढील चार-पाच दिवस हवामान पूर्णपणे कोरडे राहील. पुढील 48 तासांत तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होईल. 8 मे पासून जोधपूर, बिकानेर, जयपूर आणि भरतपूर विभागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून कमाल तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले जाईल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.