
RBI Governor Reaction on 2000 Rupees Notes: अलीकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २००० रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा करता येतील आणि बदलून घेता येतील, अशी माहितीही आरबीआयने दिली आहे.
मात्र अजूनही नागरिकांच्या मनात यासंबंधित बरेच प्रश्न आहेत. यातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास (Rbi Governor Shashikant Das) यांनी २००० ची नोट का बंद केली, याबाबत खुलासा केला आहे.
नागरिकांना आवाहन करताना शक्तीकांत दास म्हणाले की, ''नोटा बदलण्यासाठी घाई करू नका. चार महिन्यांचा कालावधी आहे. आरामात नोटा बदला.'' (Latest Marathi News)
३० सप्टेंबरनंतर २००० च्या नोटांचे काय होईल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, ''३० सप्टेंबरनंतर २००० रुपयांच्या नोटा कायदेशीर राहणार नाही, असं आम्ही म्हटलेलं नाही.''
ते म्हणाले की, ''आम्हाला आशा आहे की ३० सप्टेंबरच्या आत जास्तीत जास्त २००० रुपयांची नोट परत येईल. त्यानंतरही या नोटा बाजारात राहिल्या तर यासंबंधित पुढील माहिती दिली जाईल.'' शक्तिकांता दास म्हणाले की, ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतची तारीख निश्चित करण्यात आली आहे जेणेकरून लोकांनी ती गांभीर्याने घ्यावी. नाही तर ही प्रक्रिया खूप लांबली असती.''
म्हणाले पुढे की, ''२००० रुपयांच्या नोटा बदलण्याची मर्यादा २०,००० रुपये आहे. पण जर एखाद्याला त्याच्या बँक खात्यात २००० रुपयांच्या नोटा जमा करायच्या असतील तर त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही.''
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.