समुद्रातून कच्च तेल काढण्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री यापूर्वी भारताबाहेरून आयात करावी लागत होती. मात्र आता त्याची आवश्यकता नाहीय. कारण आता कच्च तेल काढण्यासाठी महाराष्ट्राच्या सुपुत्रानेच पुढाकार घेतलाय. उद्योजक अशोक खाडे यांनी या प्रश्नावर तोडगा काढलाय.
मेक इन इंडिया या संकल्पनेतून देशात साकारलेला हा मोठा प्रकल्प... दास कंपनीच्या माध्यमातून 200 एकरवर उभारण्यात आलाय. समुद्रातून कच्चं तेल काढण्यासाठी लागणारे दोन हजार टनाचे जॅकेट अवघ्या चार ते पाच महिन्यात उभारण्यात आलेत. हे जॅकेट आंध्रप्रदेशातील काकिनाडा येथील समुद्रात बसवण्यात येणार आहे. ह्या जॅकेट ची वाहतूक करण्यासाठी लागणाऱ्या बोटीची निर्मिती याच ठिकाणी दास कंपनीने केलीय.. त्यामुळे भारताला आता कच्च तेल काढण्यासाठी लागणारी यंत्र सामग्री आयात करण्याची गरज नाहीय.
या प्रकल्पाने रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून दिलीय. या प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळालाय
सांगली जिल्ह्यातील पेड या छोट्याश्या गावात राहणारे अशोक खाडे यांच्या संकल्पनेतून साकारलेला प्रकल्प देशातील मराठी उद्योजकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.तर राष्ट्रासाठी देखील एक महात्वाचं योगदान ठरणाराय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.