Navratri 2022 : नवरात्रीत जवाची पेरणी का केली जाते? धार्मिक महत्त्व आणि कारणे जाणून घ्या

नवरात्रीत कलश आणि ज्वारी म्हणजेच जवाच्या घटस्थापनेला खूप महत्त्व आहे.
Shardiy Navratra 2022
Shardiy Navratra 2022Saam Tv

Shardiy Navratri 2022 : हिंदू धर्मात नवरात्रीच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावर्षी शारदीय नवरात्रीची (Navratra) सुरुवात २६ सप्टेंबर २०२२ पासून होत आहे. नवरात्रीमध्ये देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा विधीनुसार केली जाते आणि उपवास केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये लोक आपल्या घरात अखंड ज्योत लावतात. यासोबतच माता राणीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीत कलश आणि ज्वारी म्हणजेच जवाच्या घटस्थापनेला खूप महत्त्व आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना म्हणजेच कलशाच्या स्थापनेसोबत जवाची पेरणी (Sowing) केली जाते. याशिवाय आई अंबेची पूजा अपूर्ण राहते, असे म्हणतात. कलशाची स्थापना करून जव पेरण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. अशा परिस्थितीत आज जाणून घेऊया नवरात्रीत जवाची पेरणी का केली जाते आणि त्यामागे कोणती धार्मिक श्रद्धा आहे.

Shardiy Navratra 2022
Shardiy Navratri 2022 : नवरात्रीमध्ये देवीची पूजा करण्यापूर्वी, 'हे' नियम जाणून घ्या

जवाची पेरणी का केली जाते ?

जव हे ब्रह्मदेवाचे प्रतीक मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, ब्रह्माजींनी जेव्हा हे विश्व निर्माण केले, तेव्हा वनस्पतीमध्ये पहिले पीक आले ते 'जव'. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या वेळी प्रथम जवाची पूजा केली जाते आणि ती कलशातही स्थापित केली जाते.

जव हे विश्वाचे पहिले पीक मानले जाते, म्हणून जेव्हा जेव्हा देव-देवतांची पूजा केली जाते किंवा हवन केले जाते तेव्हा फक्त जव अर्पण केला जातो. जव हे अन्नासारखे आहे, म्हणजे ब्रह्म आणि अन्न यांचा नेहमी आदर केला पाहिजे, असेही म्हटले जाते. म्हणूनच पूजेत बार्लीचा वापर केला जातो.

यावरून नवरात्रीत जव पेरल्याचे सूचित होते -

नवरात्रीत कलश स्थापनेदरम्यान पेरलेली जव दोन-तीन दिवसांत उगवते, पण ती उगवली नाही तर भविष्यात ते शुभ लक्षण नाही. दोन-तीन दिवसांनंतरही त्यांना अंकुर फुटला नाही, तर मेहनत केल्यावरच फळ मिळेल, असा समज आहे.

Shardiy Navratra 2022
Shardiya Navratri 2022 : शारदीय नवरात्रीत आहे 'या' दिवशी शुभ योग, अशा पध्दतीने पूजा केल्यास होतील लाभ !

याशिवाय जर जव वाढले असेल पण त्याचा रंग खालून अर्धा पिवळा आणि वरून अर्धा हिरवा असेल तर याचा अर्थ येत्या वर्षाचा अर्धा काळ ठीक असेल, पण नंतर समस्यांना तोंड द्यावे लागेल. दुसरीकडे, जर पेरलेली जव हे पांढऱ्या किंवा हिरव्या रंगात वाढत असेल तर ते खूप शुभ मानले जाते. म्हणजे केलेली उपासना सफल झाली आहे. येणारे वर्ष खूप आनंदाचे असेल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com