उजनीच्या पाण्यावरुन सोलापूर - इंदापूर वाद पेटणार? 

Ujani Dam Water issue becoming Hot
Ujani Dam Water issue becoming Hot

पंढरपूर :  उजनी धरणातील Ujani Dam पाणी वाटपावरून आधीच मराठवाडा विरुध्द सोलापूर यांच्यात रणकंदन सुरु असतानाच पालकमंत्री दत्तात्रय भरणे Dattatray Bharne यांनी उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याची प्रशासकीय मान्यता मिळवून दिली आहे. त्यामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भूमिके विषयी सोलापूर Solapur जि्ल्हयातील शेतकऱ्यांमधून  तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. Solapur Indapur Quarrel may occur over Ujani Water

स्वाभीमानी शेतकरी संघटनेसह विविध राजकीय पक्षांनी देखील इंदापूरला पाणी देण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्यावरुन सोलापूर विरुध्द इंदापूर असा नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार Maha Vikas Aghadi आल्यानंतर पहिल्यांदा नीरा Neera उजव्या कालव्याचे  पंढरपूर, सांगोला तालुक्यासाठी मंजूर असलेलं पाणी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी सत्ता येताच रद्द करुन ते  पु्न्हा बारामतीकडे Baramati वळवलं.  अशातच आता उजनी धरणातून इंदापूर Indapur तालुक्यातील २२ गावांसाठी उपसा सिंचन योजनेसाठी ५ टीएमसी पाणी देण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. Solapur Indapur Quarrel may occur over Ujani Water

महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयाला व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भूमिकेला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध सुरु केला आहे. दोन दिवसांपासून  पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली आहे. ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमांच दहन करुन निषेधही
व्यक्त केला जात आहे. याच घटनेचा निषेध म्हणून करमाळा तालुक्यातील शेतकरीआणि महिलांनी पालकमंत्र्यांच्या Guardian Minister प्रतिमेला उजनीच्या पाण्यात जलसमाधी दिली. त्यानंतर आज स्वाभीमानी शेतकरी संघटनेने देखील उजनीतून इंदापूर तालुक्याला पाणी देण्यास विरोध केला आहे.

सोलापूर जिल्ह्याची वरदायीनी अशी ओळख असलेल्या उजनी धरणातून सोलापूर शहरासह जिल्ह्यातील शेतीला पाणी दिले जाते. परंतु आता  जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तहान  भागण्यापूर्वीच उजनीतील  पाण्याची   पळवापळवी  सुरु झाली आहे. उजनी धरणातून  मराठावाड्याला Marathwada पाणी देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोळेगाव बंधाऱ्यात  उजनी धरणातून पाणी दिले जाते.

धरणाच्या निर्मितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे योगदान मोठं आहे. अनेक शेतकऱ्यांची घरंदारं याच धरणात गेली आहेत. असे असतानाही अनेक लाभार्थी शेतकरी Farmers आजही उजनी धरणातील  हक्काच्या पाण्यापासून Water वंचित आहेत. अजूनही शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचले नाही. सततच्या दुष्काळामुळे दरवर्षी धरणातील पाणी पातळी कमी होते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना व येथील लोकांना पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करावी लागते. Solapur Indapur Quarrel may occur over Ujani Water

धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था येथील शेतकऱ्यांची आहे. असं असतानाही  उजनी  धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा घाट सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घातला आहे.  उजनीच्या पाण्यावरन  इंदापूर विरुद्ध सोलापूर असा संघर्ष  पेटण्याची   शक्यता आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com