मुंबई : आयपीएलच्या १५ व्या पर्वात (IPL 2022) भारताचे दोन धुरंदर फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit sharma) धावांसाठी संघर्ष करत आहेत. यंदाच्या मोसमात दोघंही मोठी धावसंख्या करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे विराट आणि रोहित सारख्या दिग्गज खेळाडूंच्या फॉर्मची चिंता सर्वांनाच सतावत आहे. मात्र, बीसीसीआयचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) विराट कोहली आणि रोहित शर्माच्या फॉर्मवर विश्वास दाखवला आहे. विराट-रोहित हे महान खेळाडू असून ते लवकरच चांगल्या फॉर्ममध्ये येतील, अशी आशा गांगुलीनं व्यक्त केलीय.
माध्यमांशी संवाद साधताना सौरव गांगुलीनं विराट आणि रोहितच्या फॉर्मबाबत भाष्य केलं आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा दिग्गज खेळाडू असून त्यांच्या बॅमधून लवकरच धावांची फटकेबाजी होईल, असा आशावाद गांगुलीनं व्यक्त केला आहे. तसंच विराट कोहलीबाबतही गांगुलीनं सूचक वक्तव्य केलं आहे. विराटच्या मनात काय चाललंय हे मला माहित नाही. पण मला त्याच्यावर विश्वास आहे. विराट महान खेळाडू आहे. विराट लवकरच चांगल्या फॉर्ममध्य येईल आणि धावांचा ओघ सुरु होईल. आयपीएल हंगामावर बोलताना गांगुली म्हणाले, आयपीएल २०२२ मध्ये नव्यानं समावेश झालेल्या गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स दोन्ही संघांनी उत्तम कामगिरी केलीय. दोन्ही संघातील खेळाडूंनी चमकदार प्रदर्शन केलं आहे. दोन्ही संघांचं प्रदर्शन खूपच चांगलं असल्यानं कुणीही जिंकू शकतो.
आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने नऊ सामन्यांमध्ये १६ च्या सरासरीनं फक्त १२८ धावा केल्या आहेत. तसंच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मालाही अद्याप सूर गवसलेला नाही. रोहितने आठ सामन्यांमध्ये १९.१३ च्या सरासरीनं १५३ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये दोघांना अर्धशतकंही करता आलं नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.