Team India : बीसीसीआय घेणार मोठा निर्णय; टी-२० सामन्यांसाठी हार्दिक पांड्याला मिळणार कर्णधारपदाची जबाबदारी?

बीसीसीआय क्रिकेट फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या कर्णधाराचा विचार करत आहे.
Team India News
Team India Newssaam tv

Team India News : टी-२० वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेत भारतीय संघाला फार चांगली कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत टीम इंडिया सेमीफायनलला स्पर्धेबाहेर गेली. या पराभवानंतर बीसीसीआयने टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय क्रिकेट फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या कर्णधाराचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्ध मालिका होईल, या मालिकेसाठी बीसीसीआयने मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. (Latest Marathi News)

Team India News
IPL News: मुंबई इंडियन्सने कायरन पोलार्डची 12 वर्षांची साथ सोडली? कोणत्या खेळाडूंना केलं रिटेन?

हार्दिक पांड्या होऊ शकतो टी-२० टीमचा कर्णधार

जानेवारी महिन्यात टीम इंडिया (Team India) श्रीलंकेला भिडणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआय वनडे आणि टी-२० सामन्यांसाठी वेगवेगळे कर्णधार निवडण्याची शक्यता आहे. वनडे सामन्यांसाठी रोहित शर्माला कर्णधारपदाची जबाबदारी कायम असेल. तर हार्दिक पांड्या टी-२० सामन्यांसाठी टीम इंडियांचा मदार सांभाळताना दिसू शकतो. भारतीय टीम जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्ध तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळण्यात येणार आहे.

बीसीसीआयच्या (BCCI) एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, 'आताच सर्व जाहीर करणे फार घाईचे ठरेल. आम्ही आता विचार करत आहोत की, वनडे आणि टी-२० सामन्यांसाठी वेगवेगळे कर्णधार निवडणे योग्य की अयोग्य याबाबत विचार सुरू आहे. या निर्णयामुळे एका खेळाडूवरील कामाचा भार कमी होऊ शकतो. आम्हाला टी-२० फॉरमॅटसाठी नव्या दृष्टीकोनाची आवश्यकता आहे. २०२३ साली भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या अनुषंगाने टीम इंडियाचा विचार करणे आवश्यक आहे'.

Team India News
T-20 Word Cup: टीम इंडियाच्या जखमेवर पाकच्या पंतप्रधानांनी मीठ चोळलं; इरफान पठाणने भरली सणसणीत मिर्ची

रोहितचा भार होणार कमी

टीम इंडियाचा प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगवेगळ्या कर्णधार नियुक्ती केल्यामुळे रोहित शर्माला टी-२० सामन्याचे कर्णधारपद सोडावं लागणार आहे . मात्र, यावर बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले की, 'सदर निर्णय हा रोहित शर्मानं टी-२० सामन्याचे कर्णधारपद सोडण्यासाठी नाही, तर रोहितचा भविष्यातील कामाचा भार कमी करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. आम्हाला वाटते की, टी-२० टीमसाठी नव्या दृष्टीकोन आणि युवा खेळाडूंची गरज आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com