Birth Anniversary: 'रणजी ट्राॅफी' नाव कसे? कोण आहे खेळाडू? जाणून घ्या

देशाची सर्वात मोठी देशांतर्गत स्पर्धा म्हणजेच रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) ही अशा खेळाडूच्या नावाने खेळली जाते, जो भारतासाठी एकही सामना खेळला नाहीये ही आश्चर्यकारक बाब आहे.
Birth Anniversary: 'रणजी ट्राॅफी' नाव कसे? कोण आहे खेळाडू? जाणून घ्या
Birth Anniversary: 'रणजी ट्राॅफी' नाव कसे? कोण आहे खेळाडू? जाणून घ्या Saam Tv

देशाची सर्वात मोठी देशांतर्गत स्पर्धा म्हणजेच रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) ही अशा खेळाडूच्या नावाने खेळली जाते, जो भारतासाठी एकही सामना खेळला नाहीये ही आश्चर्यकारक बाब आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) द्वारे प्रत्येक हंगामात रणजी ट्रॉफीच्या नावाने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले जाते, ज्यात तीन डझनहून अधिक संघ सहभागी होतात. इंग्लंडसाठी आयुष्यभर क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूच्या नावावर या ट्रॉफीचे नाव आहे. अशा स्थितीत तुम्ही विचार करत असाल की ही लाजिरवाणी बाब आहे, पण ही लाजिरवाणी बाब नाही, ज्याच्या नावाने रणजी ट्राफी खेळली जाते तो इंग्लंडकडून क्रिक्रेट खेळला आहे. परंतू त्याने भारताचे नाव इंग्लंडमध्ये रोशन केले आहे.

Birth Anniversary: 'रणजी ट्राॅफी' नाव कसे? कोण आहे खेळाडू? जाणून घ्या
IND vs ENG: पाचवा कसोटी सामना का झाला रद्द? ECB ने दिली माहिती

ज्याच्या नावाने रणजी ट्राफीचे नाव आहे तो क्रिकेटर रणजीत सिंह जी, ज्यांची आज जयंती आहे. 10 सप्टेंबर 1872 रोजी काठियावाड (गुजरात) येथे जन्मलेले रणजीत सिंग इंग्लंडसाठी क्रिकेट खेळले, कारण त्यावेळी भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा भारताचा पहिला खेळाडू होता. रणजीत सिंगने 1896 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. 1896 ते 1902 पर्यंत त्याने इंग्लंडसाठी एकूण 15 सामने खेळले. रणजीत सिंह जीने कसोटी पदार्पणात कांगारू संघाविरुद्ध शतक झळकावले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 989 धावा केल्या, तर तो ससेक्स, लंडन काउंटी आणि केंब्रिज विद्यापीठासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आहे.

Birth Anniversary: 'रणजी ट्राॅफी' नाव कसे? कोण आहे खेळाडू? जाणून घ्या
T-20 Wolrd Cup Sqaud: IPL मधील धमाक्यामुळे 'क्रिस गेल'ला लाॅटरी

रणजीत सिंह जी विभाजी जडेजा नवनगरचे 10 वे जाम साहेब आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू होते, त्यांना नवनगरचे जाम साहेब, कुमार रणजित सिंहजी, रणजी आणि स्मिथ म्हणूनही ओळखले जाते. तो एक महान फलंदाज होता, ज्याने भारतीय क्रिकेटच्या विकासात महत्वाची भूमिका बजावली, कारण त्याच्या आधी कोणताही क्रिकेटपटू नव्हता ज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. तो इंग्लिश क्रिकेट संघाकडून खेळणारा प्रसिद्ध क्रिकेटपटू होता. रणजीत सिंग हा उजव्या हाताचा फलंदाज होता आणि तो संथ गतीने गोलंदाजी देखील करायचा, पण त्याला कसोटी क्रिकेटच्या चार डावांमध्ये फक्त एक विकेट मिळाली, पण प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 133 विकेट्स घेतल्या.

त्याची गणना आतापर्यंतच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. नेव्हिल कार्ड्सने त्याला 'द मिडसमर नाईट्स ड्रीम ऑफ क्रिकेट' असेही म्हटले. त्याच्या फलंदाजीने त्याने क्रिकेटला एक नवीन शैली दिली आणि खेळात क्रांती घडवली. त्यांच्या मृत्यूनंतर, बीसीसीआयने 1934 मध्ये त्यांच्या सन्मानार्थ भारताच्या विविध शहरांमध्ये आणि प्रदेशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट मालिकेला 'रणजी ट्रॉफी' असे नाव दिले. रणजीत सिंह जी ला सर्वोत्तम फलंदाज असेही म्हटले जाते कारण त्याने 307 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 24,692 धावा केल्या होत्या, ज्यात 72 शतके आणि 109 अर्धशतके होती. या आकडेवारीवरून अंदाज लावला जाऊ शकतो की रणजीतसिंग प्रथम श्रेणी क्रिकेटचा एक महान खेळाडू होता.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com