Ind vs Aus 3rd ODI: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामान्यांच्या मालिकेतील अंतिम वनडे सामना बुधवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला २१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
यासह भारतीय संघाला ही मालिका गमवावी लागली आहे. कोणी विचारही केला नव्हता की, भारतीय संघाला मायदेशात पराभवाचा सामना करावा लागेल.
दरम्यान सामना झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा संताप व्यक्त करताना दिसून आला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुध्द झालेल्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माने खेळपट्टीचा कारणीभूत ठरवलं आहे. रोहित शर्माच्या मते भारतीय संघातील फलंदाज जेव्हा फलंदाजी करण्यासाठी आले त्यावेळी खेळपट्टी जरा वेगळीच वाटत होती. (Latest sports updates)
हा सामना झाल्यानंतर रोहित शर्माने म्हटले की,'२६९ धावा या खेळपट्टीवर खूप जास्त नव्हत्या. मात्र भारतीय संघातील फलंदाज जेव्हा फलंदाजी करण्यासाठी उतरले त्यावेळी खेळपट्टी आव्हानात्मक वाटत होती.'
या खेळपट्टीवर गोलंदाजी करताना ऍडम झंपाने ४ आणि एश्टन एगरने २ गडी बाद केले होते. या दोन्ही फिरकी गोलंदाजांनी मिळून भारतीय संघाचा डाव संपुष्ठात आणला.
या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २७० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव ४९.१ षटकात २४८ धावांवर संपुष्ठात आला.
विराट कोहलीची ५४ आणि हार्दिक पंड्याची ४० धावांची खेळी वगळली,तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. या पराभवासह भारतीय संघाने ही मालिका २-१ ने गमावली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.