
भारत विरुद्ध बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुपर ४ फेरीतील शेवटचा सामना पार पडला. या अटीतटीच्या लढतीत बांगलादेश संघाने बाजी मारली आहे. शेवटी बांगलादेश संघाने दमदार खेळ करत ६ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या बांगलादेश संघाने २६६ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करण्यात भारताचा संघ अपयशी ठरला आहे.
गिलची शतकी खेळी..
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २६६ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. रोहित शर्मा शून्यावर माघारी परतला. मात्र गिलने एक बाजू सांभाळून ठेवली.
मात्र त्याला इतर कुठल्याही फलंदाजाकडून हवी तशी साथ मिळाली नाही. सूर्यकुमार सोबत त्याने अर्धशतकी भागीदारी केली. मात्र तो २६ धावा करत माघारी परतला. पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी करणारा केएल राहुल या सामन्यात अवघ्या १९ धावांवर माघारी परतला.
बांगलादेशने केल्या २६६ धावा..
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण स्वीकारत बांगलादेशकडून फलंदाजी करताना शाकिब अल हसनने सर्वाधिक ८० धावांची खेळी केली.
या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याचे शतक अवघ्या २० धावांनी हुकले. तर तोहीद हृदोयने ५४ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ५ चौकार आणि २ षटकार खेचले. शेवटी नसूम अहमदने ४४ धावांचे योगदान दिले. या बांगलादेशने ८ गडी बाद २६५ धावा केल्या आहेत. (Latest sports updates)
भारत - श्रीलंकेत रंगणार अंतिम सामना..
भारतीय संघाने आशिया पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत करत आशिया चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. हा सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबोच्या मैदानावर रंगणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.