
भारत-श्रीलंकेचा अंतिम सामना रविवारी १७ सप्टेंबर रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. या अंतिम सामन्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. भारत विरुद्ध श्रीलंकेच्या अंतिम सामन्यात ८० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास आशिया चषक कोणाला मिळणार, याबाबत माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)
रविवारी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता आहे. रविवारी कोलंबोमध्ये ८० टक्के पावसाची शक्यता आहे. कोलंबोमध्ये दुपारी १ ते ७ वाजेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारत विरुद्ध श्रीलंकेचा अंतिम सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर ३ वाजता सुरु होणार आहे. अंतिम सामना पावसामुळे १७ सप्टेंबर रोजी थांबवला गेल्यास १८ सप्टेंबर रोजी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
तत्पूर्वी, पावसामुळे रविवारी १७ आणि १८ सप्टेंबर रोजी सामन्याचा निकाल लागला गेला नाही. तर दोन्ही संघाना संयुक्तपणे आशिया कप स्पर्धेचा चषक देण्यात येईल. पाऊस आल्यास भारत विरुद्ध श्रीलंका संघामध्ये २०-२० षटकाचा सामनाही होण्याची शक्यता आहे.
भारत विरुद्ध श्रीलंकेचा अंतिम सामना रद्द झाल्यास रोहित शर्मा आणि दासुन शनाका या दोघांना आशिया चषक संयुक्तपणे देण्यात येईल. भारत विरुद्ध श्रीलंकेदरम्यान आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी २००२ अंतिम सामन्यात कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर २९ आणि ३० सप्टेंबर रोजी पावसामुळे सामना रद्द झाला होता.
त्यामुळे कर्णधार सौरव गांगुली आणि सनथ जयसूर्याला दोघांमध्ये संयुक्तपणे चषक देण्यात आला होता. त्यावेळी दोन्ही संघांना संयुक्तपणे विजयी घोषित करण्यात आलं होतं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.