
IND vs SL,Asia Cup:
कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आशिया चषकातील अंतिम सामना झाला. टीम इंडियांच्या मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहने गोलंदाजीने अवघा संघ ५० धावांवर तंबूत परतवला. श्रीलंकेने दिलेल्या अवघ्या ५१ धावांचं आव्हान टीम इंडियाने सात षटकातच पूर्ण करत मोठा विजय मिळवला आहे.
टीम इंडियाने आठव्यांदा आशिया चषक जिंकत इतिहास रचला आहे. टीम इंडिया जिंकल्यानंतर भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Latest Marathi News)
इंडिया विरुद्ध श्रीलंकेदरम्यान रविवारी आशिया कपचा अंतिम सामना झाला. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारतीय गोलंदाजांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजाच्या चिंधड्या उडवल्या. टीम इंडियाच्या एकट्या मोहम्मद सिराजने श्रीलंकेचे सहा गडी बाद केले.
श्रीलंकेची टीम १५.२ षटकात ५० धावांवर तंबूत परतली. श्रीलंकेने एकदिवसीय सामन्याच्या इतिहासातील आतापर्यंतचं सर्वाधिक कमी लक्ष्य दिलं. टीम इंडियाच्या सिराजने स्फोटक गोलंदाजी करत ७ षटकात २१ धावा देऊन ६ गडी बाद केले. सिराजने एकाच षटकात ४ गडी बाद केले. तर हार्दिक पंड्याने तीन तर जसप्रीत बुमराहने एक गडी बाद करत श्रीलंकेला ५० धावांवर रोखलं.
श्रीलंकेने दिलेल्या अवघ्या ५१ धावांचं आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने ६.१ षटकात आव्हान पूर्ण करत सामना जिंकला. टीम इंडियाकडून शुबमन गिलने १९ चेंडूत २७ धावा तर ईशान किशन १८ चेंडूत नाबाद २३ धावा ठोकल्या.
टीम इंडियाने आठव्यांदा हा आशिया चषक जिंकला आहे. आशिया चषकातील मोठ्या विजयानंतर भारतीयांकडून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे .
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.