Rishabh Pant: भारताचा स्टार क्रिकेटपटू रिषभ पंतच्या भीषण अपघाताच्या बातमीने क्रिडाविश्वात खळबळ उडाली आहे. दिल्लीहून हम्मदपूरकडे परतत असताना हा अपघात झाला. यावेळी ऋषभ पंत स्वत: गाडी चालवत होता. हा अपघात इतका भयंकर होता की गाडीने पेट घेतला.
मात्र प्रसंगावधान राखत रीषभ पंतने केलेल्या धाडसाने त्याचा जीव वाचला, नक्की काय होती प्रसंगानंतरची परिस्थिती, आणि रिषभ पंतने केलेली चलाखी, चला जाणून घेवू. (Rishabh Pant Accident)
क्रिकेटपटू रिषभ पंतचा पहाटे भीषण अपघात झाला असून त्याच्यावर डेहराडूनमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी रीषभ पंत स्वतः गाडी चालवत होता. भरधाव वेगात असलेल्या गाडीमध्ये रिषभचा डोळा लागल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती समोर आली आहे, मात्र भीषण अपघातातही रिषभने प्रसंगावधान दाखवले.
ज्यावेळी रिषभ पंतचा अपघात झाला त्याठिकाणी त्याच्या मदतीसाठी कोणीही नव्हते, असे असतानाही रिषभने स्वतः गाडीची काच फोडली आणि गाडीबाहेर पडला. अपघातानंतर गाडीने पेट घेतला ज्यामध्ये गाडी जळून खाक झाली. सुदैवाने अपघातानंतर रिषभ पंत बेशुद्ध पडला नाही, ज्यामुळे त्याला गाडीतून बाहेर पडता आले. रिषभ पंतला गाडीबाहेर पडता आले नसते किंवा तो अपघातानंतर बेशुद्ध झाला असता तर हा अपघात जिवावर बेतला असता असेही बोलले जात आहे.
दरम्यान, रिषभ पंतला नववर्षाच्या सुरूवातीला होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली नव्हती. (Indian Cricket Team) आता या भीषण अपघात घडल्याने हे वर्ष त्याच्यासाठी खास ठरले नसल्याची चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये सुरू आहे. रिषभच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.