
आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा घोषणा केली आहे. २२ ते २७ सप्टेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वनडे सामने होणार आहेत.
पहिल्या दोन सामन्यासाठी घोषित केलेल्या संघात रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्याला विश्रांती देण्यात आली आहे. तर टीम इंडियाचं नेतृत्व केएल राहुलकडे देण्यात आलं आहे. (Latest Marathi News)
मुख्य निवडकर्ते अजित आगारकर यांनी सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी वेगळी आणि तिसऱ्या सामन्यासाठी वेगळ्या संघाची घोषणा केली आहे. तर टीम इंडियाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची संघात वापसी झाली आहे. तर अक्षर पटेलची देखील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी पहिल्या २ सामन्यासाठी संघात कोणाला स्थान?
केएल राहुल (कर्णधार, यष्टीरक्षक), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन,सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, वाशिंगटन सुंदर या खेळांडूना पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी हिटमॅन करणार संघाच नेतृत्व
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, हार्दिक पांड्या, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अक्षर पटेल (*) रविचंद्रन अश्विन, वॉशिंगटन सुंदर या खेळाडूंना तिसऱ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.