
बंगळूर (Ranji Trophy Latest Marathi News) : मुंबई (mumbai) आणि मध्य प्रदेश (madhya pradesh) यांच्यात आज (बुधवार) रणजी करंडक (ranji trophy 2022) क्रिकेट (cricket) स्पर्धेचा आज अंतिम सामना हाेत आहे. या सामन्याचा आजचा पहिला दिवस असून एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळविला जात असलेल्या या सामन्याचे नाणेफेक मुंबईने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (Mumbai captain Prithvi Shaw Wins toss, opts to bat against Madhya Pradesh)
आजपर्यंत ही स्पर्धा मुंबईने 41 वेळा जिंकली आहे. 88 वर्षांच्या जुन्या इतिहासातील सर्वाधिक विजेतेपद मुंबईच्या नावावर आहे. दरम्यान, मध्य प्रदेशने 1998-99 हंगामात फक्त एकदाच अंतिम फेरी गाठली हाेती आणि उपविजेतेपद पटकावले.
यंदाच्या हंगामात मुंबईने उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशशी बरोबरी साधली आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्य प्रदेशने उपांत्य फेरीत बंगालचा १७४ धावांनी पराभव करत २३ वर्षांत पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली आहे.
आज मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ही जाेडी सलामीस आली आहे. तर मध्यप्रदेशच्या कर्णधार आदित्य श्रीवास्तवने (Aditya Shrivastva) डावखू-या फिरकी गाेलंदाज कुमार कार्तिकेयनला पहिले षटक दिले. मुंबईच्या 19 षटकात बिनबाद 65 धावा झाल्या आहेत.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.