
IND VS AUS Test series saba karim: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटूने देखील भारतीय संघाबाबत मोठे वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले आहे. (Latest sports updates)
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सबा करीम यांनी भारतीय संघाबद्दल बोलताना म्हटले की, 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या हव्यासापोटी भारतीय संघाने कसोटी क्रिकेटचा आत्मा गमावला आहे. सध्या पहिला आणि दुसऱ्या क्रमांकाचा संघ एकमेकांचा सामना करतोय. जर दोन्ही संघांनी कसोटी क्रिकेट हे कसोटी क्रिकेटच्या पैलूंच्या दृष्टीने खेळले असते तर आणखी मनोरंजक वाटले असते.'
तसेच खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त करताना त्यांनी म्हटले की,' अशा प्रकारची खेळपट्टी निर्माण करून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे. स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली हे अव्वल दर्जाचे फलंदाज आहेत त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते मैदानात येत असतात. त्यामुळे अशी खेळपट्टी बनवून तुम्हाला काय दाखवून द्यायचं आहे.'
भारतीय संघाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करायचा असेल, तर कुठल्याही परिस्थितीत चौथा कसोटी सामना जिंकावा लागणार आहे.
हा सामना गमावलास भारतीय संघाचा अंतिम फेरीत जाण्याच मार्ग आणखी कठीण होऊ शकतो. मालिकेतील अंतिम सामना ९ मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.