
IND VS AUS 3rd Test sunil gavaskar: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या मैदानावर पार पडला.
या सामन्यात भारतीय संघाला ९ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर भारतीय खेळाडूंवर टीका केली जात आहे.
दरम्यान भारतीय संघाचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी भारतीय संघाची नेमकी कुठे चूक झाली याबाबत वक्तव्य केले आहे. (Latest sports updates)
या सामन्यात अनेक टर्निंग पॉईंट्स पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाचा नवखा गोलंदाज कुन्हेमनने या सामन्यातील पहिल्या डावात ५ गडी बाद करत भारतीय संघाचा कार्यक्रम केला.
तर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सुरु असताना भारतीय गोलंदाजांनी अवघ्या ११ धावांवर गडी बाद केले होते. मात्र सुनील गावसकरांच्या मते रवींद्र जडेजाने टाकलेला नो बॉल या सामन्याचा टर्निंग पॉईंट होता.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाकडून ३१ धावांची खेळी करणारा लाबुशेन हा खाते ही न उघडता माघारी परतला असता. रवींद्र जडेजाने त्याला बाद केले होते . मात्र हा चेंडू नो बॉल होता. त्यामुळेलाबुशेनला जीवदान मिळाले होते.
याबाबत बोलताना सुनील गावसकरांनी म्हटले की,' जर तुम्ही मागे वळून पाहिलं तर तुम्हाला जाणवेल की याच कारणामुळे तुम्ही सामना गमावला. कारण त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि लाबशेनने मिळून ९६ धावांची भागीदारी केली. मला वाटतं हाच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. या कारणामुळे भारतीय संघाला सामना गमवावा लागला आहे.'
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.